• Fri. Mar 6th, 2026
    कोकणाची ‘वंदे भारत’ दक्षिणेच्या अंगणात? सीएसएमटी-मडगाव अन् मडगाव-मंगळूर एकत्रीकरणाचा घाट

    Vande Bharat Express: रेल्वे मंडळाने मुंबई-मडगाव आणि मडगाव-मंगळूर वंदे भारत एक्स्प्रेसचे एकत्रीकरणाच्या हालचाली सुरू केल्या आहेत. यामुळे कोकणवासीयांमध्ये प्रचंड अस्वस्थता आहे.

    महाराष्ट्र टाइम्स
    Vande Bharat Train.

    मुंबई : कोकणवासीयांची हक्काची ‘वंदे भारत’ (मुंबई-मडगाव) आता दक्षिणेच्या अंगणात उभी करण्याचा घाट रेल्वे मंडळाने घातला आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी/मुंबई) – मडगाव – मुंबई वंदे भारत एक्स्प्रेसला ९० टक्क्यांहून अधिक प्रवासी भारमान असल्याने डबे वाढवण्याची मागणी होत असताना रेल्वे मंडळाने मुंबई-मडगाव आणि मडगाव-मंगळूर वंदे भारत एक्स्प्रेसचे एकत्रीकरणाच्या हालचाली सुरू केल्या आहेत. यामुळे कोकणवासीयांमध्ये प्रचंड अस्वस्थता आहे.

    पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २७ जून २०२३ रोजी देशातील १९ व्या मुंबई-मडगाव-मुंबई एक्स्प्रेसला हिरवा झेंडा दाखवला. ही कोकणातील पहिली ‘वंदे भारत’ ठरली. पहिल्याच फेरीत गाडीचे प्रवासी भारमान ९० टक्क्यांहून अधिक होते. सध्या ‘सीसी’ आणि ‘ईसी’ या दोन्ही श्रेणींची आसने २९ मार्च ते ३ एप्रिलदरम्यान आरक्षित झाली असून, प्रतीक्षायादी ७९वर पोहोचली आहे.
    PM मोदी गुढीपाडव्याला नागपूर दौऱ्यावर; स्वागतासाठी भाजपची जंगी तयारी सुरु, कसा असेल दौरा?
    गाडी क्रमांक २२२२९/३० मुंबई-मडगाव-मुंबई वंदे भारत एक्सप्रेसला पहिल्या दिवसापासून प्रवाशांचा उदंड प्रतिसाद असून, आठ डब्यांची गाडी असल्याने अनेकदा प्रतीक्षा यादी असते. या उलट, गाडी क्रमांक २०६४५/२०६४६ मंगळूर-मडगाव वंदे भारत एक्स्प्रेसला प्रवाशांचा अत्यल्प प्रतिसाद आहे. यामुळे सीएसएमटीहून सुटणाऱ्या मडगाव ‘वंदे भारत’चा विस्तार मंगळूरपर्यंत करण्याच्या हालचालींना वेग आला आहे.

    मुंबई-मडगाव-मुंबई आणि मंगळूर-मडगाव-मंगळुर अशा दोन वंदे भारत एकत्रीकरणासाठी कर्नाटकातील लोकप्रतिनिधी सातत्याने पाठपुरावा करत आहेत. रेल्वे मंडळातील वरिष्ठ अधिकाऱ्यांसह मध्य रेल्वे, कोकण रेल्वे आणि दक्षिण रेल्वे अशी बैठक नुकतीच पार पडली. बैठकीत वंदे भारतच्या एकत्रीकरणाबाबत रुपरेषा ठरवण्यात आली आहे. मात्र, अद्याप अधिकृत घोषणा झालेली नाही, असे रेल्वेतील सूत्रांनी सांगितले.
    शिंदेंच्या फायरब्रँड आमदाराला राज्यमंत्रिपदाचा दर्जा, फडणवीसांनी जाहीर केलेल्या समितीचं प्रमुखपद
    मंगळूर-मडगाव वंदे भारत एक्सप्रेसला अपुरे थांबे आहेत. कारवार आणि उडुपीदरम्यान १९० किलोमीटर अंतर ही गाडी कुठेच थांबत नाही. त्याकडे रेल्वे मंडळाने लक्ष देणे आवश्यक आहे. त्यामुळे दोन्ही ‘वंदे भारत’चे एकत्रीकरण केल्यास सर्वसामान्य कोकणवासीयांमधून तीव्र नाराजी व्यक्त होईल, अशी प्रतिक्रिया कोकण रेल्वेचे अभ्यासक आणि कोकण रेल्वे समितीचे अक्षय महापदी यांनी ‘महाराष्ट्र टाइम्स’शी बोलताना दिली.

    अवघी १५ टक्के आसनेदोन ‘वंदे भारत’चे एकत्रीकरण केल्यानंतर खेड, रत्नागिरी, कणकवली, थिवी या स्थानकांतील प्रवाशांना मोठा फटका बसणार आहे. त्यांना एकूण क्षमतेच्या केवळ १५ ते २० टक्के जागा उपलब्ध होण्याचा अंदाज आहे. उर्वरित जागा दक्षिणेकडील स्थानकांना जाऊन कोकणासाठी अत्यल्प कोटा उपलब्ध होणार आहे. परिणामी कमी तिकीटे उपलब्ध होतील.

    किशोरी तेलकर

    लेखकाबद्दलकिशोरी तेलकर किशोरी तेलकर, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये कन्सल्टंट म्हणून कार्यरत असून पत्रकारितेमध्ये पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले आहे. ऑनलाइन माध्यमांमध्ये फ्रीलान्सिंगचा २ वर्षांचा अनुभव आहे आणि आता मटा ऑनलाइनमध्ये आहे. जनरल बातम्यासोबतच गुन्हेगारीविषयक बातम्यांमध्ये रस.… आणखी वाचा

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed