• Fri. Mar 6th, 2026
    “मुस्लिमांना ईदचे गिफ्ट देत आहेत पण मंत्रीपद देत नाहीत”अबु आझमींचं मोदींवर टीकास्त्र

    Authored byआशिष मोरे | महाराष्ट्र टाइम्स.कॉम | Updated: 28 Mar 2025, 9:40 am

    Abu Azmi On Saugat-E-Modi : समाजवादी पार्टीचे नेते अबु आझमी यांनी या ‘सौगात-ए-मोदी’ च्या निमित्ताने पंतप्रधान नरेंद् मोदींवर टीकास्त्र सोडले. ते म्हणाले की मोदी मुस्लिमांना गिफ्ट देत आहेत पण मंत्रीपद देत नाहीत.”जब इलेक्शन आवत हैं! मांगो भात पुलाव भी आवत हैं!” अशा एका हिंदी कवीच्या कवीतेच्या काहि ओळीही त्यांनी म्हटल्या.

    महाराष्ट्र टाइम्स.कॉम

    मुंबई : मुस्लिम बांधवांना दिल्या जाणाऱ्या सौगात-ए-मोदी वरुन राजकारण तापल्याचे दिसत आहे. अनेक राजकारण्यांनी मोदींच्या हिंदुत्त्वाबद्दल टिकेची झोळ उठवलेली असतानाच समाजवादी पक्षाचे नेते अबु आझमी(Abu Azmi) यांनीही मोदींवर निशाणा साधला आहे. “नरेंद्र मोदी(Narendra Modi) मुस्लिमांना ईदचे गिफ्ट देत आहेत पण मंत्रीपद देत नाहीत”. अशी खोचक टीका अबु आझमींनी केली.

    रमजान ईद निमित्त देशभरातील गरिब मुस्लिम बांधवांना भाजपातर्फे सौगात-ए-मोदी किटचे वाटप केले जाणार आहे. ज्यात अन्नधान्य आणि गोडाधोडाचे पदार्थ असणार आहेत. निवडणुकीवेळी ‘एक है तो सेफ है’, ‘बटेंगे तो कटेंगे’ अशा घोषणा देत भाजपने जातीय राजकारण करुन निवडणुक जिंकल्याचा आरोप विरोधकांनी भाजपावर(BJP) केला. भाजपने हिंदुत्त्वाचा नारा देत मुस्लिम समजाबद्दल आपला रोष व्यक्त केला असेही विरोधकांचे म्हणणे आहे. आणि अशातच मुस्लिमांचा पवित्र मानला जाणारा रमजान ईदचा सण जवळ आला असताना भाजपने देशभरातील गरिब मुस्लिम कुटुंबीयांकरिता ‘सौगात-ए-मोदी'(Saugat-E-Modi) चे आयोजन केल्याने भारतीय राजकारण तापत आहे.

    समाजवादी पार्टीचे नेते अबु आझमी यांनी या ‘सौगात-ए-मोदी’ च्या निमित्ताने पंतप्रधान नरेंद् मोदींवर टीकास्त्र सोडले. ते म्हणाले की मोदी मुस्लिमांना गिफ्ट देत आहेत पण मंत्रीपद देत नाहीत.”जब इलेक्शन आवत हैं! मांगो भात पुलाव भी आवत हैं!” अशा एका हिंदी कवीच्या कवीतेच्या काहि ओळीही त्यांनी म्हटल्या.

    अबु आजमी पुढे म्हणाले की, “आमची देशाचे पंतप्रधान मोदींकडून इतकीच अपेक्षा आहे की देशाचे संविधान जो हक्क प्रत्येक जाती धर्माला देतो तो आम्हालाही मिळावा. बाकी आम्हाला दुसरे काही नको. आमच्या सोबत जो अन्याय आणि अत्याचार होतो तो व्हायला नको” अशा प्रतिक्रिया त्यांनी दिल्या. दुसरीकडे, उद्धव ठाकरेंनी देखील सौगात-ए-मोदीवरुन भाजप आणि मोदींवर निशाणा साधला. काल(२७ मार्च) त्यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत “भाजपने हिंदुत्व सोडलं असं जाहिर करावं” असे ते म्हणाले. ‘एरवी मुस्लिमांच्या नावाने शिमगा करायचा आणि होळीला पुरण पोळी द्यायची’ असा खोचक टोला देखील त्यांनी लगावला.

    आशिष मोरे

    लेखकाबद्दलआशिष मोरेमहाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन टीममध्ये डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून कार्यरत. राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि मानसशास्त्र बातम्यांमध्ये आवड. सायकॉलॉजी मध्ये विशेष अध्ययन.… आणखी वाचा

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed