• Mon. Mar 9th, 2026
    आईसह नवविवाहितेने आयुष्य संपवलं, ६ महिन्यांपूर्वी झालेलं मुलीचं लग्न; काय घडलं? परिसरात हळहळ

    Tuljapur Crime News : तुळजापूरमध्ये आई आणि नुकतंच लग्न झालेल्या विवाहित मुलीने आयुष्य संपवल्याची घटना समोर आली आहे. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

    Lipi

    रहिम शेख, धाराशिव : अनेक मुली सध्या आपला होणारा नवरा नोकरदार असावा, अधिकारी असावा अशी अपेक्षा ठेवतात. नोकरदार, अधिकारी या मुलांना अनेकदा नवरा म्हणून मुलींची पसंती मिळते. तर दुसरीकडे शेतकरी मुलगा नवरा म्हणून नको असल्याचं म्हणत शेतकरी मुलांना नकार मिळत असल्याचं अनेकदा समोर आलं आहे. परंतु एखाद्या शेतकरी मुलाच्या घरची परिस्थिती चांगली असेल, तर आपली मुलगी सुखी आणि आनंदी राहील, या हेतूनच मुलीचे आई – वडील मुलीच्या सुखासाठी मुलीचं लग्न तिच्या इच्छे विरुद्ध लावून देतात अशा घटना समोर आहेत. असाच एक प्रकार समोर आला असून यातून भयंकर, धक्कादायक पाऊल मुलीने उचलल्याची घटना घडली आहे.

    नेमकं काय घडलं?

    असाच एक प्रकार तुळजापूर शहरात घडला आहे. आपल्या मनाविरुद्ध शेतकरी मुलासोबत लग्न लावून दिल्याने नवविवाहित तरुणीने टोकाचं पाऊल उचलत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ६ महिन्यांपूर्वी मुलीचं एका शेतकरी मुलाशी लग्न लावून देण्यात आलं होतं. पण २३ वर्षीय नव-विवाहितेने आपल्या आईसह नायलॉनच्या दोरीने गळफास घेऊन घरात आत्महत्या केली आहे. आपल्या इच्छे विरुद्ध शेतकरी मुलासोबत लग्न लावण्यात आलं, ही गोष्ट असह्य झाल्यामुळे तरुणीने टोकाचं पाऊल उचललं असल्याची माहिती आहे.
    Pune Crime : संसार अर्ध्यावर मोडला; सासूकडून छळ, विवाहितेचं टोकाचं पाऊल, पुण्यातील मन हेलावणारी घटना
    तुळजापूर शहरातील गवते प्लॉटिंग येथे राहणाऱ्या सौ. रत्नमाला संजय पवार, वय ४५, रा करंजे ता. करमाळा हल्ली मुक्काम तुळजापूर आणि यांची नवविवाहित मुलगी प्रतीक्षा तुषार पाटील, वय २३ रा. सापटने ता. टेभुर्णी असं आत्महत्या केलेल्या माय – लेकींची नावं आहेत. या दोघींनी राहत्या घरामध्ये आतून कडी लावून गळफास घेतला. ही घटना समजताच पोलीस निरिक्षक आण्णासाहेब मांजरे, पोलीस उपनिरिक्षक विजय थोटे, तपास अंमलदार शिखारे हे घटनास्थळी हजर झाले.
    Parbhani News : महिलेला कुलरचा शॉक, तिला वाचवण्यासाठी जाव गेली आणि भयंकर घडलं; सख्ख्या जावांचा कुलरला चिकटून दुर्दैवी अंत

    Dharashiv News : आईसह नवविवाहितेने आयुष्य संपवलं, ६ महिन्यांपूर्वी झालेलं मुलीचं लग्न; काय घडलं? परिसरात हळहळ

    सदर घटनेबाबत अद्याप स्पष्ट कारण समोर आलं नाही. मात्र केवळ शेतकरी मुलाबरोबर लग्न लावलं म्हणून टोकाचं पाऊल उचलल्याची चर्चा सर्वत्र आहे. मात्र मूळ कारण अजूनही अस्पष्ट आहे. याप्रकरणी पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.

    करिश्मा भुर्के

    लेखकाबद्दलकरिश्मा भुर्केमहाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून कार्यरत. सामना, झी २४ तास, न्यूज १८ लोकमतसह ४ वर्ष पत्रकारिता क्षेत्रातील अनुभव. सामाजिक, मनोरंजन विश्लेषणात्मक लेखनाची आवड.… आणखी वाचा

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed