Tuljapur Crime News : तुळजापूरमध्ये आई आणि नुकतंच लग्न झालेल्या विवाहित मुलीने आयुष्य संपवल्याची घटना समोर आली आहे. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
नेमकं काय घडलं?
असाच एक प्रकार तुळजापूर शहरात घडला आहे. आपल्या मनाविरुद्ध शेतकरी मुलासोबत लग्न लावून दिल्याने नवविवाहित तरुणीने टोकाचं पाऊल उचलत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ६ महिन्यांपूर्वी मुलीचं एका शेतकरी मुलाशी लग्न लावून देण्यात आलं होतं. पण २३ वर्षीय नव-विवाहितेने आपल्या आईसह नायलॉनच्या दोरीने गळफास घेऊन घरात आत्महत्या केली आहे. आपल्या इच्छे विरुद्ध शेतकरी मुलासोबत लग्न लावण्यात आलं, ही गोष्ट असह्य झाल्यामुळे तरुणीने टोकाचं पाऊल उचललं असल्याची माहिती आहे.
Pune Crime : संसार अर्ध्यावर मोडला; सासूकडून छळ, विवाहितेचं टोकाचं पाऊल, पुण्यातील मन हेलावणारी घटना
तुळजापूर शहरातील गवते प्लॉटिंग येथे राहणाऱ्या सौ. रत्नमाला संजय पवार, वय ४५, रा करंजे ता. करमाळा हल्ली मुक्काम तुळजापूर आणि यांची नवविवाहित मुलगी प्रतीक्षा तुषार पाटील, वय २३ रा. सापटने ता. टेभुर्णी असं आत्महत्या केलेल्या माय – लेकींची नावं आहेत. या दोघींनी राहत्या घरामध्ये आतून कडी लावून गळफास घेतला. ही घटना समजताच पोलीस निरिक्षक आण्णासाहेब मांजरे, पोलीस उपनिरिक्षक विजय थोटे, तपास अंमलदार शिखारे हे घटनास्थळी हजर झाले.
Parbhani News : महिलेला कुलरचा शॉक, तिला वाचवण्यासाठी जाव गेली आणि भयंकर घडलं; सख्ख्या जावांचा कुलरला चिकटून दुर्दैवी अंत
Dharashiv News : आईसह नवविवाहितेने आयुष्य संपवलं, ६ महिन्यांपूर्वी झालेलं मुलीचं लग्न; काय घडलं? परिसरात हळहळ
सदर घटनेबाबत अद्याप स्पष्ट कारण समोर आलं नाही. मात्र केवळ शेतकरी मुलाबरोबर लग्न लावलं म्हणून टोकाचं पाऊल उचलल्याची चर्चा सर्वत्र आहे. मात्र मूळ कारण अजूनही अस्पष्ट आहे. याप्रकरणी पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.

