Indian Fisherman Dies In Pakistan Jail: समुद्रात मासेमारी करताना चुकून पाकिस्तानी हद्दीत गेल्याच्या कारणावरून त्याला अटक करण्यात आली होती.
या पार्श्वभूमीवर, शिक्षा पूर्ण झालेल्या भारतीयांना तातडीने मायदेशी आणण्यासाठी केंद्र सरकारने पाकिस्तानसोबत पाठपुरावा करावा, अशी मागणी ज्येष्ठ पत्रकार व शांततावादी कार्यकर्ते जतीन देसाई यांनी केली आहे.
सन २०२२मध्ये मासेमारी करताना चुकून पाकिस्तानच्या सागरी हद्दीमध्ये गेलेल्या भारतीय मच्छिमारांना पाकिस्तानच्या मेरीटाइम सेक्युरिटी एजन्सीने पकडले होते. त्यापैकी एका मच्छिमाराने पाकिस्तानच्या कराचीतील मलीर तुरुंगात मंगळवारी आत्महत्या केली आहे. त्याचे वय ५३ वर्षे होते. या मच्छिमाराला २०२२ मध्ये पाकिस्तानने अटक केली होती. त्याच वर्षी त्याची शिक्षा पूर्ण झाली होती. मात्र त्याला भारतात परत पाठवण्यासाठी पाकिस्तानकडून प्रयत्न झाले नाहीत. पाकिस्तानातील तुरुंगात खितपत पडलेल्या भारतीय कैद्यांमधील नैराश्याची भावना यामुळे अधोरेखित झाली आहे, याकडे जतीन देसाई यांनी लक्ष वेधले.
Rahul Gandhi: मला बोलण्यास मज्जाव; लोकसभाध्यक्षांच्या तिखट सल्ल्यानंतर राहुल यांचा आरोप
या मच्छिमाराने नैराश्यातून आत्महत्या केली असण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे आता तरी या सर्व मच्छिमारांना तत्काळ मायदेशी पाठवण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे, असे ज्येष्ठ पत्रकार व शांततावादी कार्यकर्ते जतीन देसाई यांनी म्हटले आहे.

