Ajit Pawar Big Statement : “बेरजेचे राजकारण करायचं, वजाबाकीचे राजकारण करून कोणी पुढे जात नाही. राजकारणात कोणी कायमचा शत्रू नसतो किंवा कायमचा मित्रही नसतो”, असं मोठं वक्तव्य अजित पवार यांनी केलं. यावेळी अजित पवार यांनी आपला पक्ष सोडून इतर पक्षांमध्ये गेलेल्या नेत्यांना पुन्हा आपल्या पक्षात घेण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचं सूचक वक्तव्य केलं. त्यामुळे आगामी काळात पडद्यामागे मोठ्या हालचाली घडणार असल्याचे संकेत अजित पवारांकडून देण्यात आले आहेत.
“अलीकडे प्रत्येकाला भावकीच जास्त त्रास देते”, असं अजित पवार मिश्किलपणे म्हणाले. “बेरजेचे राजकारण करायचं, वजाबाकीचे राजकारण करून कोणी पुढे जात नाही. राजकारणात कोणी कायमचा शत्रू नसतो, कायमचा मित्रही नसतो. शेवटच्या माणसापर्यंत पोहोचता आलं पाहिजे. यावेळी सर्व धर्म समभाव महत्वाचा आहे. रायगड म्हणजे शिवाजी महाराजांच्या भूमीतून तुम्ही आले आहात. तिथे विकासाठी हवा तेवढा निधी द्यायचा प्रयत्न आम्ही करत आहोत. पण तिथे काम करण्यास बऱ्याच मर्यादा येतात. ते तटबंदीचे काम लवकर व्हावे असा प्रयत्न आमचा आहे”, असं अजित पवार म्हणाले.
‘पुन्हा परिवार मोठा करण्याचा प्रयत्न’
“आपली विचारधारा एकच आहे. स्नेहल आता ज्या पक्षाचे चिन्ह घेऊन उभी होती, त्याची विचारधारा वेगळी होती. तुम्हाला इथे आल्यापासून पश्चाताप होणार नाही. उलट तुम्ही आले याचा मला अभिमान आहे. रायगड आणि कोकणाने अनेक वेळा आपली साथ दिली. केसरकर, सामंत, भास्कर जाधव, संजय कदम, रमेश कदम हे सर्व राष्ट्रवादीचे. काही जण इकडे तिकडे गेले. पण पुन्हा परिवार मोठा करण्याचा प्रयत्न करू आहे”, असं सूचक वक्तव्य अजित पवार यांनी केलं.
“नवी मुंबईत देखील मंदा म्हात्रे राष्ट्रवादीच्या महिला अध्यक्ष होत्या. गणेश नाईकांच्या नेतृत्वात तिकडे काम सुरू आहे. आता बंदरासाठी रायगडला निधी द्यायचा प्रयत्न मी केला आहे. रायगडमध्ये नवी मुंबईत जूनमध्ये एअरपोर्ट सुरू करतोय. देशातल्या पहिल्या पाच एअरपोर्टमध्ये ते आहे”, असंही अजित पवार यावेळी म्हणाले.
‘Aaditya Thackeray यांची नार्को टेस्ट करा’, Bhavana Gawali विधान परिषदेत आक्रमक
स्नेहल जगताप यांच्या पक्षप्रवेशावर अजित पवार काय म्हणाले?
“महत्त्वाचा पक्षप्रवेश झालाय. पक्ष वाढविण्याचा प्रयत्न सर्वजण करत असतात. चांगलं काम व्हावं. प्रत्येकाच्या भागातील प्रश्न सोडविण्याचे काम केले जात आहे. नव्या चेहऱ्यांना संधी देण्याचं काम करतात. आज अधिवेशन संपेल. त्यानंतर पालकमंत्री पदाचा विषय सुटेल. मुख्यमंत्री आणि आम्ही मिळून प्रश्न सोडवत आहोत. पालकमंत्रीपद महत्वाचं आहे. गरीब कुटुंबातला व्यक्ती महायुती सरकारमुळे आज महाराष्ट्राच्या विधानसभेचा उपाध्यक्ष झाला”, असं अजित पवार म्हणाले.
BIG News : बांधकाम कामगारांसाठी सरकारची मोठी घोषणा, 12 हजार रुपये निवृत्ती वेतन मिळणार
विरोधकांना उद्देशून अजित पवार काय म्हणाले?
“कधीतरी सकारात्मक विचार करा. मी तुम्हाला नाकारत नाही. विरोधी पक्षनेता निवड आमच्या हातात नाही. लोकसभेला दहा वर्ष विरोधी पक्षनेते पद नव्हते. तशीच परस्थिती आताही आहे. २०१४ ला आर आर पाटील यांना विरोधी पक्षनेता करायचं होतं. त्यावेळी आम्हाला ते मिळाले नाही. नियम महत्वाचे आहेत. याबाबत लवकर निर्णय होईल”, असं अजित पवार विरोधी पक्षांना उद्देशून म्हणाले.

