Authored byसूरज सकुंडे | Contributed byरहीम शेख | महाराष्ट्र टाइम्स.कॉम25 Mar 2025, 8:49 pm
भारत हा कृषिप्रधान देश…परंतु याच भारतातील तरुण आज शेती करायला तयार नाहीत. शेती परवडत नसल्यामुळं आज हजारो तरुण उपजिवीकेसाठी शहरांमध्ये स्थलांतरीत होतायत. एकीकडे हे चित्र दिसत असताना दुसरीकडे नांदेडमधील एक दिव्यांग शेतकरी लखपती झालाय. कल्पकतेनं शेती केली, तर शेतीमधून तुम्ही मालामाल होऊ शकता, हे या शेतकऱ्यानं दाखवून दिलंय.