Aditya Thackeray On Devendra Fadnavis – देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या एका विधानावर आदित्य ठाकरेंनी प्रतिक्रिया दिली आहे. त्यावर त्यांनी त्यांना दिलदार आणि मोठ्या मनाचे म्हणत उपरोधिक टोला लगावला आहे.
आम्ही आकड्यावर वाकडे जाणारे नाहीत
ते पुढे म्हणाले आम्ही आकड्यांवर वाकडे जाणारे लोक नाहीत आहोत. शतप्रतिशत हे आमचं म्हणणं नव्हत कधी. त्यावेळी युती तोडली कोणी हे आता बाहेर यायला लागलं आहे. सरकारी भाषेत अशंत: हे बाहेर येत आहे. जर तर काय झाले असतं त्याला महत्त्वाचे नाही. आजची परिस्थिती महत्त्वाची आहे. ४०० वर्षानंतर ते आता १० वर्षावर आले आहेत.
युती तोडण्याच्या कोणाच्या मनात होत?
४ जागावरुन युती तुटली या प्रश्नावर आदित्य ठाकरे म्हणाले की, ४ जागा १ जागा अतिमंत: युती तोडण्याचं कोणाच्या मनात होतं हे आपल्याला माहित आहे. त्यावेळी उद्धव साहेबांनी विचारलं होत की अजून एक दिवस आहे. बसून चर्चा करु शकतो. युती तोडली कोणी हे काल स्पष्ट झालेलं आहे.युती तोडली आणि कशी तोडली गेली हे खडसे साहेबांनी आधीच स्पष्ट केले आहे.
प्रश्नांवर सरकार बोलायला तयार नाही
ते पुढे म्हणाले शेतकरी आत्महत्या, दुष्काळ, सीबीएसई अभ्यासक्रम, महिलांवरील अत्याचारावर सरकार बोलायला तयार नाही. रस्त्यांच्या विषयावर अध्यक्षांनी निर्देश दिले आहेत. त्यांचे आभार मानतो. नगरविकास खात्याचे मंत्री थातूर मातूर काहीतरी करु गेले.आधीचे घटनाबाह्य मुख्यमंत्री हे दबाव टाकून कामे करुन घेत होते.
विरोधीपक्षनेता उद्याच नेमावा ही मागणी आज आम्ही संविधानावर चर्चा करतोय, ज्या लोकांना संविधान बदलायचं होतं. ज्या लोकांना संविधानाबद्दल राग आहे. महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकरांबद्दल राग आहे अशी लोक आज संविधानावर भाष्य करतात. एकच अपेक्षित आहे की या संविधानाप्रमाणे विरोधी पक्षनेता पद हे उद्या जाहीर झाले पाहिजे.

