Ajit Pawar On Aurangzeb Tomb : औरंगजेबच्या कबरीवरून उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्पष्ट भूमिका मांडली आहे. त्यांनी असे जुने मुद्दे काढण्याची गरज नसल्याचे सांगितले. तसेच त्यांनी देशासमोरील एआयच्या महत्त्वपूर्ण मुद्द्यांकडे लक्ष्य वेधले आहे.
अजित पवारांनी मांडली रोखठोक भूमिका
औरंगजेबच्या कबरीवरून राजकीय नेते भाष्य करताना दिसत आहेत. दोन गट या मुद्दावरून बघायला मिळत आहेत. आज उपमुख्यमंत्री अजित पवार हे छत्रपती संभाजीनगरमध्ये आहेत. काल ते नांदेड दाैऱ्यावर होते. आता नुकताच अजित पवार यांनी औरंगजेबच्या कबरीबद्दल अत्यंत मोठे भाष्य केले आहे. औरंगजेबच्या कबरीवर ते अगदी स्पष्ट बोलताना दिसत आहेत. सर्व चर्चांना त्यांनी पूर्णविराम दिल्याचेही बघायला मिळतंय.
शिंदेंवरील कवितेनंतर कुणाल कामराविरोधात शिवसैनिक आक्रमक, सेटची तोडफोड, युवासेना पदाधिकाऱ्यांवर गुन्हाआता हा मुद्दा काढण्याची काय गरज
अजित पवार म्हणाले की, मला हे कळत नाही की छत्रपती शिवाजी महाराज आपल्याला सोडून १६८० ला गेले. आता हा सर्व काळ ८० चा आता आहे २०२५. का असे जुने मुद्दे काढले जात आहेत. आता ही समाधी आज आहे का? अनेक पंतप्रधान अनेक राष्ट्रपती रायगडला येऊन गेले. वेगवेगळे राजकीय नेते येऊन गेले. मध्येच कुठले ना कुठले मुद्दे काढले जातात. आपले म्हणणे मांडण्याचा अधिकार हा प्रत्येकाला आहे.
अजित पवार छत्रपती संभाजीनगर दाैऱ्यावर
पुढे अजित पवार म्हणाले, माझे स्वत: चे असे मत आहे की, ज्याच्यातून नवीन प्रश्न निर्माण होतील. आज आपल्यासमोर राज्यासमोर आणि देशासमोर एआयचा प्रश्न आहे. बजेटमध्येही मी त्याच्याबद्दल बोललो आहे. औरंगजेबाच्या कबरीचा मुद्दा आता काढण्याची गरज काय? असेच थेट अजित पवार यांनी म्हटले आहे. औरंगजेबच्या कबरीवरून वाद सुरू असतानाच अजित पवार यांनी आपली भूमिका अगदी स्पष्ट केल्याचे यावरून आता दिसत आहे.

