• Tue. Mar 10th, 2026

    औरंगजेबाच्या कबरीबद्दल अजित पवारांचे मोठे विधान, रोखठोक भूमिका मांडत म्हणाले, हा मुद्दा..

    औरंगजेबाच्या कबरीबद्दल अजित पवारांचे मोठे विधान, रोखठोक भूमिका मांडत म्हणाले, हा मुद्दा..

    Ajit Pawar On Aurangzeb Tomb : औरंगजेबच्या कबरीवरून उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्पष्ट भूमिका मांडली आहे. त्यांनी असे जुने मुद्दे काढण्याची गरज नसल्याचे सांगितले. तसेच त्यांनी देशासमोरील एआयच्या महत्त्वपूर्ण मुद्द्यांकडे लक्ष्य वेधले आहे.

    महाराष्ट्र टाइम्स.कॉम

    छत्रपती संभाजीनगर : खुलताबाद येथील औरंगजेबच्या कबरीवरून (Aurangzeb Tomb) राजकारण पेटले आहे. नागपूरमध्येही मोठा हिंसाचार झाला आणि काही भागांमध्ये संचारबंदी लागू करण्यात आली. आता हळूहळू नागपुरमधील जनजीवन सुरळीत होताना दिसतंय. औरंगजेबच्या कबरीचा विषय चर्चेत आल्यानंतर प्रशासनाने मोठा निर्णय घेत कबरीच्या परिसरातील पोलिस बंदोबस्त वाढवला. खुलताबादमधील प्रत्येक गोष्टीवर प्रशासन लक्ष ठेऊन आहे. कोणत्याही प्रकारचा वाद होऊ नये, याकरिता प्रशासनाकडून दक्षता घेतील जातंय.

    अजित पवारांनी मांडली रोखठोक भूमिका

    औरंगजेबच्या कबरीवरून राजकीय नेते भाष्य करताना दिसत आहेत. दोन गट या मुद्दावरून बघायला मिळत आहेत. आज उपमुख्यमंत्री अजित पवार हे छत्रपती संभाजीनगरमध्ये आहेत. काल ते नांदेड दाैऱ्यावर होते. आता नुकताच अजित पवार यांनी औरंगजेबच्या कबरीबद्दल अत्यंत मोठे भाष्य केले आहे. औरंगजेबच्या कबरीवर ते अगदी स्पष्ट बोलताना दिसत आहेत. सर्व चर्चांना त्यांनी पूर्णविराम दिल्याचेही बघायला मिळतंय.
    शिंदेंवरील कवितेनंतर कुणाल कामराविरोधात शिवसैनिक आक्रमक, सेटची तोडफोड, युवासेना पदाधिकाऱ्यांवर गुन्हाआता हा मुद्दा काढण्याची काय गरज

    अजित पवार म्हणाले की, मला हे कळत नाही की छत्रपती शिवाजी महाराज आपल्याला सोडून १६८० ला गेले. आता हा सर्व काळ ८० चा आता आहे २०२५. का असे जुने मुद्दे काढले जात आहेत. आता ही समाधी आज आहे का? अनेक पंतप्रधान अनेक राष्ट्रपती रायगडला येऊन गेले. वेगवेगळे राजकीय नेते येऊन गेले. मध्येच कुठले ना कुठले मुद्दे काढले जातात. आपले म्हणणे मांडण्याचा अधिकार हा प्रत्येकाला आहे.

    अजित पवार छत्रपती संभाजीनगर दाैऱ्यावर

    पुढे अजित पवार म्हणाले, माझे स्वत: चे असे मत आहे की, ज्याच्यातून नवीन प्रश्न निर्माण होतील. आज आपल्यासमोर राज्यासमोर आणि देशासमोर एआयचा प्रश्न आहे. बजेटमध्येही मी त्याच्याबद्दल बोललो आहे. औरंगजेबाच्या कबरीचा मुद्दा आता काढण्याची गरज काय? असेच थेट अजित पवार यांनी म्हटले आहे. औरंगजेबच्या कबरीवरून वाद सुरू असतानाच अजित पवार यांनी आपली भूमिका अगदी स्पष्ट केल्याचे यावरून आता दिसत आहे.

    शितल मुंढे

    लेखकाबद्दलशितल मुंढेमहाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन टीममध्ये सिनिअर डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून कार्यरत. राजकीय, मनोरंजन, शिक्षण आणि क्राईम बातम्यांमध्ये विशेष आवड. लोकमत आणि टीव्ही 9 मराठीसह पत्रकारिता क्षेत्रात 6 वर्षांचा अनुभव.… आणखी वाचा

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed