• Tue. Apr 22nd, 2025 6:07:00 PM

    Sanjay Raut : ‘ठाकरेंनी फोन केलाच नाही, उलट राणेंना अटक झाल्यावर शहांनी…’; संजय राऊतांचा मोठा खुलासा

    Sanjay Raut : ‘ठाकरेंनी फोन केलाच नाही, उलट राणेंना अटक झाल्यावर शहांनी…’; संजय राऊतांचा मोठा खुलासा

    Sanjay raut on Narayan Rane : खासदार नारायण राणे यांनी सुशांत सिंग राजपूतच्या आत्महत्या प्रकरणात खळबळजनक दावे केले आहेत. त्यांनी असा दावा केला आहे की, सुशांत सिंगच्या हत्येचा व्हिडीओ मोबाईलद्वारे शूट करण्यात आला आहे. संजय राऊत यांनी याबाबत प्रतिक्रिया देताना याप्रकरणी अशी कोणतीही फोन कॉल झाल्याची नोंद नसल्याचे सांगितले आहे.

    महाराष्ट्र टाइम्स.कॉम

    मुंबई : सुशांत सिंग आत्महत्या प्रकरणाबाबत खासदार नारायण राणे यांनी पुन्हा एकदा खळबळजनक दावा केला आहे. सुशांत सिंग राजपूतच्या हत्येचा व्हिडीओ मोबाईल शुटिंग करण्यात आल्याचं नारायण राणे यांनी म्हटलं आहे. त्यासोबतच ज्यावेळी या प्रकरणामध्ये आदित्य ठाकरे यांचं मी एक मंत्री असल्याचा उल्लेख केल्यावर ठाकरेंनी मला फोन केल्याचा दावा नारायण राणे यांनी केला होता. याबाबत संजय राऊत यांनी खुलासा करताना असा कोणताही फोन झाल्याचं सांगत उलट राणेंच्या अटकवेळी शहांनी फोन केल्याचं राऊतांनी सांगितलं आहे.

    उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा झाली, याचा त्यांनी इन्कार केला. असा कोणताही फोन नारायण राणे यांना झालेला नाही. मिलिंद नार्वेकर यांच्याशी बोलणं झालं ते म्हणाले मी कधी असा फोन लावून दिलेला नाही. आता यातले प्रमुख व्यक्ती आहेत नारायण राणे ज्यांचा उल्लेख करतायेत. नारायण राणे कशाच्या आधारावर अशा प्रकारची वक्तव्य करतायेत हे समजून घेणं गरजेचं आहे. त्यांची प्रकृती बरी नाहीये का? सत्तरी पार केलीय. त्यांच्या प्रकृतीची चिंता वाटतेय, पण उद्ध ठाकरे आणि नार्वेकर यांनी स्पष्टपणे सांगितलं असं संभाषण झालेलं नाही. राणेंनी मुख्यमंत्र्यांवर भाष्य केलं त्यावेळी त्यांना अटक झाली. त्यांच्यासाठी कुटुंबातून उद्धव ठाकरेंना फोन आले होते. सांभाळून घ्या, त्यांची प्रकृती बरी नाही, काही विकार आणि त्रास आहेत. त्यानंतर संध्याकाळी उद्धव ठाकरेंनी पोलिसांना सूचना देऊन त्यांची सुटका करायला लावली. केंद्रातून उद्धव ठाकरे यांना अमित शहांचा फोन आला होता. ते आमचे केंद्रीय मंत्री आहेत, जरा सांभाळून घ्या, असं संजय राऊत यांनी सांगितलं.

    राणेंच्या कुटुंबियांचे फोन आले होते. या गोष्टी काढायच्या असतात का, पण तुम्ही काढल्यामुळे आम्हाला सांगावं लागतंय, हे महाराष्ट्राचं दुर्देव आहे. व्यक्तीगत चर्चा खोटा मोलावा देऊन बाहेक काढल्या जातात. असं काढायला गेलो तर प्रत्येकाचे संबंध काहीना काही कुठेतरी असतात. महाराष्ट्रामध्ये असं वातावरण कधीच नव्हतं. कोणतीही कारवाई कुटुंबापर्यंत जात नव्हती. गेल्या दहा वर्षाच मोदी-शहांचं राज्य आल्यापासून देशामध्ये अशा प्रकारचं दळभद्री वातावरण तयार झालं असल्याचं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.

    हरिश मालुसरे

    लेखकाबद्दलहरिश मालुसरे महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन टीममध्ये सिनिअर डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून कार्यरत. क्रीडा, राजकीय आणि क्राईम बातम्यांमध्ये विशेष आवड. झी 24 तास आणि टीव्ही9 मराठीसह पत्रकारिता क्षेत्रात 04 वर्षांचा अनुभव.… आणखी वाचा

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed