Nagpur Violence : नागपुरात मोठ्या प्रमाणात बांग्लादेशी नागरिक अवैधरीत्या वास्तव्यास आहेत. विशेषतः उत्तर आणि मध्य नागपूरच्या घनदाट वस्तीमध्ये ते मोठ्या संख्येने राहतात. त्यामुळे या घटनेत त्यांचा हात असण्याची शक्यता पोलिसांकडून तपासली जात आहे.
सोशल मीडियाचा प्रमुख वापर
सोमवारी रात्री उसळलेल्या दंगलीत सोशल मीडियाचा मोठ्या प्रमाणात गैरवापर करण्यात आला. अनेक व्हाट्सअप ग्रुप आणि फेसबुक अकाउंट्सवरून एकाच समुदायाविरोधात भडकावू पोस्ट आणि अफवा पसरवल्या गेल्या. नागपूर पोलिसांच्या सायबर शाखेने यासंदर्भात तपास केला असता, एका फेसबुक अकाउंटवरून अत्यंत आक्षेपार्ह आणि भडकावू पोस्ट करण्यात आल्याचे आढळले. या अकाउंटचा तपास केला असता तो बांग्लादेशातून नियंत्रित केला जात असल्याचे स्पष्ट झाले. या खुलाशामुळे पोलिस आणि गुप्तचर यंत्रणा अधिक सतर्क झाली असून, या हिंसाचारामागे आंतरराष्ट्रीय कट असण्याची शक्यता तपासली जात आहे.
नागपुरात मोठ्या प्रमाणात बांग्लादेशी नागरिकांचा वावर
नागपुरात मोठ्या प्रमाणात बांग्लादेशी नागरिक अवैधरीत्या वास्तव्यास आहेत. विशेषतः उत्तर आणि मध्य नागपूरच्या घनदाट वस्तीमध्ये ते मोठ्या संख्येने राहतात. त्यामुळे या घटनेत त्यांचा हात असण्याची शक्यता पोलिसांकडून तपासली जात आहे. पोलीस आयुक्तांनी नागरिकांना अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आणि शांतता राखण्याचे आवाहन केले आहे. तसेच, सोशल मीडियाद्वारे कोणत्याही प्रकारची अफवा किंवा हिंसक पोस्ट पसरवल्यास कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशाराही दिला आहे.
पोलिसांकडून गहन तपास सुरू
या हिंसाचाराच्या घटनेनंतर सायबर शाखा, गुप्तचर विभाग आणि गुन्हे शाखा संयुक्तपणे तपास करत आहेत. नागपुरात अवैधपणे वास्तव्यास असलेल्या बांग्लादेशी नागरिकांची नोंदणी करण्याची प्रक्रिया पोलिसांनी सुरू केली असून, कठोर कारवाई करण्यात येणार आहे. शहरातील शांतता अबाधित राहावी, यासाठी पोलिसांनी कठोर पावले उचलण्यास सुरुवात केली आहे.
