• Sat. Mar 7th, 2026
    अवकाळी पावसाचा अंदाज, मुंबई, पुणे, नागपूर, मराठवाड्यात असे असणार तापमान

    Maharashtra Weather Forecast : मुंबई, पुणे, नागपूर, नाशिक, सांगली, मराठवाड्यात उष्णतेत वाढ झाली होती. मात्र आता विदर्भात गडगडाटीसह पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. पुढील पाच दिवसांमध्ये अनेक ठिकाणी पाऊस पडेल आणि तापमानात घट होईल. चंद्रपूरचे तापमानही ४० अंशाच्या आसपास होते.

    महाराष्ट्र टाइम्स.कॉम

    पुणे : सातत्याने हवामानात बदल होताना दिसतोय. मागील काही दिवसांमध्ये उष्णतेत चांगलीच वाढ झाल्याचे बघायला मिळाले. मात्र, आता दिलासा मिळताना दिसतोय. विदर्भात सातत्याने पारा चढताना दिसला. मात्र, नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे. मुंबई, पुणे, नागपूर, नाशिक, जळगाव, कोकण, सांगली, छत्रपती संभाजीनगरमध्ये सुर्य आग ओकत होता. हेच नाही तर मार्च महिन्यात तब्बल तीन वेळा उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला होता. होळीनंतर पारा वाढणार असल्याचे सांगितले जात होते. मात्र, आता काही ठिकाणी पावसाचा इशारा देण्यात आलाय.

    पुढील पाच दिवसांमध्ये विदर्भात काही ठिकाणी विजांसह गडगडाटी वादळे पाऊस पडले. यासोबतच ४०-५० किमी प्रतितास वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे. अवकाळी पावसाचाच इशारा हवामान खात्याकडून आता देण्यात आलाय. हा विदर्भातील लोकांना मोठा दिलासा म्हणावा लागेल. काही दिवसांपूर्वीच चंद्रपूरचे तापमान हे ४० अंश सेल्सिअसच्या आसपास गेले होते. तापमानात सातत्याने वाढ होताना दिसली.
    मुंबई, पुणे, नागपूर, परभणी, छत्रपती संभाजीनगर, नांदेड, परभणी, बीड, जळगाव, अकोला, सांगली, सातारा, कोल्हापूर, नाशिकमध्ये आज तापमान सामन्या राहण्याची शक्यता आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये दुपारनंतर ढगाळ वातावरण राहिल. मराठवाड्यात तापमान वाढले होते. दुपारच्यावेळी शरीराची लाहीलाही होत होती. अवकाळी पावसामध्ये थोडे थंड हवामान राहण्याची शक्यता आहे. विदर्भात मोठ्या प्रमाणात बदल होताना दिसत आहेत.

    यंदा मार्चमध्येच सूर्य तळपताना दिसून येत असून, उन्हाचा कडाका वाढला आहे. उन्हामुळे होणाऱ्या काहिलीमुळे शेतकऱ्यांनी शेतीच्या कामांमध्ये बदल करून शेतीला पाणी देण्याच्या वेळा बदलल्या आहेत. यंदा रब्बी व उन्हाळी हंगामाच्या सिंचनासाठी मुबलक पाणी उपलब्ध झाल्याने यंदा कांदा लागवड, कांदा बीजात्पोदन, सोयाबिन, बाजरी या पिकांसह उशिराने गहू आणि मका पिकाचा पेरा मोठ्या प्रमाणावर झाला आहे. उन्हाळी मशागतीचे कामे शेतकरी भर उन्हात करत आहे. तापमानात मोठ्या प्रमाणावर वाढ झाल्याने तापमाण ४० डिग्री अंश सेल्सियसपर्यंत पोहचले आहे. या उन्हाच्या काहीलीचा परिणाम म्हणजे शेतकरी व शेतमजूर दुपारचे कामे सकाळी उरकताना दिसून येत आहे.

    शितल मुंढे

    लेखकाबद्दलशितल मुंढेमहाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन टीममध्ये सिनिअर डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून कार्यरत. राजकीय, मनोरंजन, शिक्षण आणि क्राईम बातम्यांमध्ये विशेष आवड. लोकमत आणि टीव्ही 9 मराठीसह पत्रकारिता क्षेत्रात 6 वर्षांचा अनुभव.… आणखी वाचा

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed