Sanjay Raut on Nagpur Violence : नागपुरात दोन गटांमध्ये दंगलीनंतर मोठ्या प्रमाणात हिंसा झाली. संजय राऊतांनी दावा केला की या दंगलीमागे भाजपचीच माणसं आहेत. फडणवीसांना दंगलीखोरांवर कारवाई करण्याचे आव्हान देत, राऊतांनी आरोप केला की भाजप नेत्यांनी राज्यात हिंदू-मुस्लिम दंगली उकरून निवडणुकांसाठी परिस्थिती भडकवण्याचा प्रयत्न केला आहे.
मुख्यमंत्र्यांच्या मतदारसंघात बाहेरून येऊन लोक दंगा पेटवतायेत, जाळपोळ होतेय याचा अर्थ असा ते गृहमंत्री म्हणून अपयशी आहे. राज्यात विधानसभेचे अधिवेशन सुरू असताना मुख्यमंत्री कायदा सुव्यवस्थेवर गर्जन करताना अशा प्रकारचा दंगा करणारे कोणेत? गेले दोन दिवस मी नागपूरमध्ये असून बजरंग दल आणि विश्व हिंदू परिषदेचे लोक या गटाचे लोक समोर येऊन भडकवणारे वक्तव्य करतायेत. ही काय बाहेरून आलेली लोक नाहीयेतय. डोक्याला चपचपतीत तेल ते नागपूरचे आहेत. हे चेहरे फडणवीसांना माहितच असणार असा दावा राऊतांनी केलाय.
हिंदूंवर भडकवण्यासाठी त्यांच्यावर हल्ला केले जातात, ही एक नवीन पॅटर्न निर्माण झाला आहे. हिदूंच्या डोक्यात भय निर्माण करायचं त्यांच्यावरती हल्ले घडवायचे. त्यांनंतर त्यांना दंगलीसाठी प्रवृत्त करायचं. राज्यात देशात दंगली पेटवून २०२९ च्या निवडणुकांना सामोर जायचं. नागपूरमध्ये फडणवीस मुख्यमंत्री, गृहमंत्री आणि त्यांचे भाजप प्रदेशाध्यक्ष नागपूरचे त्यासोबतच चार ते पाच आजूबाजूला मंत्री आहेत त्यामुळे दंगा करण्याची कोणाची हिंमत होणार आहे? दंगा करणारी त्यांचीच गँग असणार आहे. हिंदूंवर हे आपल्याच लोकांकडून हल्ला करतात आणि दंगलीमध्ये त्यांना सामावून घेतात. जर देवेंद्र फडणवीसांमध्ये दम असेल तर दंगलीखोरांवर मकोका लावून दाखवा, असं संजय राऊतांनी केलं आहे.
व्हिलनला संपवत छत्रपती शिवराय आणि छ. संभाजी महाराजांचं महत्त्व कमी करायचंय, राऊतांची भाजप-RSSवर टीका
महाराष्ट्रात आणि दिल्लीमध्ये तुमचं सरकार आहे. करसेवेची गरज काय आहे? नरेंद्र मोदींकडे जा आदेश काढा आणि केंद्रीय लोक निर्माणच्या लोकांना सांगा तोडायला, सरकार तुमचं आहे त्यामुळे दंगे का करत आहात. लोकांना का भडकवत आहात, बाळासाहेब हे स्पष्ट म्हणाले होते की आम्हाला एक बाबरी द्या बाकी सगळ्या मशिदी आणि कबरी तुमच्या आहेत. आम्ही बघनारही नाही फक्त अयोध्येमध्ये एक श्रीराम मंदिर उभे करू आणि तेसुद्धा जिथे अतिक्रमण झालं त्या जागेवर. बाकी कोणत्याही मशिदीसोबत आणि कबरीशी आमचा हस्तक्षेप असणार नाही, असंही राऊत म्हणाले.

