Nagpur Crime News- शेजाऱ्याने एका महाविद्यालयीन युवकाला शिवीगाळ करत आहे म्हणून टोकलं तर त्या तरुणाने चाकू हल्ला करत शेजाऱ्यालाच संपवल्याची घटना नागपूरातून समोर येत आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी रात्री आयुष आपल्या मित्रांसोबत दारू पिऊन झोपडपट्टीतील चौकात शिवीगाळ करत होता. यावेळी तिथे आलेल्या अंकुशने त्याला शिवीगाळ करू नको असे सांगितले. या कारणावरून दोघांमध्ये वाद झाला. रागाच्या भरात अंकुशने आयुषची कॉलर पकडली. यामुळे संतापलेल्या आयुषने घरी जाऊन भाजी चिरण्याचा चाकू आणला आणि अंकुशवर थेट चाकूने हल्ला केला. या हल्ल्यात अंकुश गंभीररित्या जखमी झाला. त्या अवस्थेतच स्थानिकांनी अंकुशला तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल केले, मात्र डॉक्टरांनी त्याला तपासून मृत घोषित केले.
हे वृत्त परिसरातील लोकांना कळताच अंकुशच्या मित्रांनी प्रचंड संताप व्यक्त करत आरोपीच्या घरावर तोडफोड केली. मात्र, पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करत परिस्थिती नियंत्रणात आणली. धंतोली पोलिसांनी तत्काळ कारवाई करत आयुषला छत्रपती चौक परिसरातून अटक केली. सध्या पोलिस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. या घटनेने संपूर्ण परिसरात खळबळ उडाली असून स्थानिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. एका १९ वर्षीय तरुणानं क्षुल्लक कारणाने शेजारच्याचा केलेला खून हे परिसरासाठी आणि शहरासाठी हादरवणार आहेवारंवार घडणाऱ्या हत्या आणि गुन्ह्यांमुळे कायदा-सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
