Nagpur Violence: उपराजधानीत दोन गटात आमनेसामने आल्यानं तणावाची परिस्थिती निर्माण झालेली आहे. दुपारच्या सुमारास विश्व हिंदू परिषदेनं आंदोलन केलं होतं. त्यावेळी जोरदार घोषणाबाजी झाली.
राज्यभरात औरंगजेबाच्या कबरीचा मुद्दा पेटलेला आहे. कबर हटवण्याची मागणी करत दुपारच्या सुमारास विश्व हिंदू परिषदेचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरले. त्यांनी मोठ्या प्रमाणात घोषणाबाजी केली. त्यामुळे परिसरात तणाव निर्माण झाला. संध्याकाळी सातच्या सुमारास दुसरा गट रस्त्यावर उतरला. त्यानंतर दोन्ही गटांनी एकमेकांवर दगडफेक केली. काही ठिकाणी वाहनं पेटवून देण्यात आली. पोलिसांकडून परिस्थिती नियंत्रणात आणण्याचे प्रयत्न सुरु आहेत. पण त्यांच्या प्रयत्नांना अद्याप यश आलेलं नाही.
आम्ही सूर्यास्ताच्या दिशेनं! मुनगंटीवारांनी बावनकुळेंना ऐकवलं; भाजप नेत्यांमध्ये जुगलबंदी
शिवाजी चौकात दोन गट आमनेसामने आले. त्यांना पोलिसांनी चिटणीस पार्कापर्यंत मागे ढकललं. परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी पोलिसांनी अश्रूधुराच्या नळकांड्या फोडल्या. मात्र त्यानंतरही तणाव कायम आहे. दोन्ही गटातील शेकडो लोक रस्त्यावर आहेत. पोलिसांवर तुफान दगडफेक केली जात आहे. त्यात काही पोलीस जखमीदेखील झाले आहेत.
Aurangzeb Tomb: औरंगजेबाची कबर छ. संभाजीनगरातच का? कोणी बांधली? टोप्या शिवण्याशी कनेक्शन; जाणून घ्या इतिहास
रस्त्यावर उतरलेल्यांची संख्या, पोलिसांवर सुरु असलेली परिस्थिती पाहता, समाज कंटकांनी हिंसाचार घडवण्याची तयारी आधीपासूनच करुन ठेवली होती का, अशी शंका उपस्थित केली जात आहे. भालदारपुराकडून अग्रसेन चौकाकडे जाणाऱ्या रस्त्यावर अनेक ठिकाणी वाहनं पेटवून देण्यात आलेली आहेत. वाहनांना लागलेली आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाचे जवान रस्त्यावर उतरले आहेत. पण ज्या भागात वाहनं जळत आहेत, तिथला जमाव अतिशय हिंसक असल्यानं अग्निशमन दलाच्या वाहनांना तिथपर्यंत पोहोचणं अवघड झालं आहे.

