• Thu. Jul 30th, 2026
    नागपुरात राडा! दोन गट आमनेसामने; घोषणाबाजी, दगडफेक, जाळपोळीमुळे तणावाची परिस्थिती

    Nagpur Violence: उपराजधानीत दोन गटात आमनेसामने आल्यानं तणावाची परिस्थिती निर्माण झालेली आहे. दुपारच्या सुमारास विश्व हिंदू परिषदेनं आंदोलन केलं होतं. त्यावेळी जोरदार घोषणाबाजी झाली.

    महाराष्ट्र टाइम्स.कॉम

    नागपूर: उपराजधानीत दोन गटात आमनेसामने आल्यानं तणावाची परिस्थिती निर्माण झालेली आहे. दुपारच्या सुमारास विश्व हिंदू परिषदेनं आंदोलन केलं होतं. त्यावेळी जोरदार घोषणाबाजी झाली. त्यानंतर संध्याकाळी सात ते साडेसातच्या सुमारास एक गट शिवाजी चौकात पोहोचला. त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. यानंतर दुसरा गट रस्त्यावर आला. त्यांनीही घोषणा देण्यास सुरुवात झाली. हळूहळू तणावाची स्थिती निर्माण झाली. आपापसात भिडलेल्या दोन गटांना पोलिसांनी वेगळं केलं. त्यांना चिटणीस पार्कापर्यंत मागे ढकललं. सध्या परिसरात मोठा फौजफाटा तैनात करण्यात आलेला आहे. दगडफेक झाल्यानं मोठं नुकसान झालं आहे. काही ठिकाणी जाळपोळही करण्यात आलेली आहे.

    राज्यभरात औरंगजेबाच्या कबरीचा मुद्दा पेटलेला आहे. कबर हटवण्याची मागणी करत दुपारच्या सुमारास विश्व हिंदू परिषदेचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरले. त्यांनी मोठ्या प्रमाणात घोषणाबाजी केली. त्यामुळे परिसरात तणाव निर्माण झाला. संध्याकाळी सातच्या सुमारास दुसरा गट रस्त्यावर उतरला. त्यानंतर दोन्ही गटांनी एकमेकांवर दगडफेक केली. काही ठिकाणी वाहनं पेटवून देण्यात आली. पोलिसांकडून परिस्थिती नियंत्रणात आणण्याचे प्रयत्न सुरु आहेत. पण त्यांच्या प्रयत्नांना अद्याप यश आलेलं नाही.
    आम्ही सूर्यास्ताच्या दिशेनं! मुनगंटीवारांनी बावनकुळेंना ऐकवलं; भाजप नेत्यांमध्ये जुगलबंदी
    शिवाजी चौकात दोन गट आमनेसामने आले. त्यांना पोलिसांनी चिटणीस पार्कापर्यंत मागे ढकललं. परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी पोलिसांनी अश्रूधुराच्या नळकांड्या फोडल्या. मात्र त्यानंतरही तणाव कायम आहे. दोन्ही गटातील शेकडो लोक रस्त्यावर आहेत. पोलिसांवर तुफान दगडफेक केली जात आहे. त्यात काही पोलीस जखमीदेखील झाले आहेत.
    Aurangzeb Tomb: औरंगजेबाची कबर छ. संभाजीनगरातच का? कोणी बांधली? टोप्या शिवण्याशी कनेक्शन; जाणून घ्या इतिहास
    रस्त्यावर उतरलेल्यांची संख्या, पोलिसांवर सुरु असलेली परिस्थिती पाहता, समाज कंटकांनी हिंसाचार घडवण्याची तयारी आधीपासूनच करुन ठेवली होती का, अशी शंका उपस्थित केली जात आहे. भालदारपुराकडून अग्रसेन चौकाकडे जाणाऱ्या रस्त्यावर अनेक ठिकाणी वाहनं पेटवून देण्यात आलेली आहेत. वाहनांना लागलेली आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाचे जवान रस्त्यावर उतरले आहेत. पण ज्या भागात वाहनं जळत आहेत, तिथला जमाव अतिशय हिंसक असल्यानं अग्निशमन दलाच्या वाहनांना तिथपर्यंत पोहोचणं अवघड झालं आहे.

    कुणाल गवाणकर

    लेखकाबद्दलकुणाल गवाणकरमहाराष्ट्र टाईम्स ऑनलाईनमध्ये सिनियर डिजिटिल कंटेट प्रोड्युसर म्हणून कार्यरत. ११ वर्षांपूर्वी वृत्तपत्रातून पत्रकारितेची सुरुवात. सकाळ, जय महाराष्ट्र, टीव्ही ९ मराठी, लोकसत्ता ऑनलाईन, न्यूज१८ लोकमत, लोकमत ऑनलाईनमधून प्रवास करत मटा ऑनलाईनपर्यंत वाटचाल; क्राईमच्या बातम्यांमध्ये हातखंडा; राजकीय, निवडणूक विषयक बातम्यांमध्ये रस.… आणखी वाचा

    Nagpur News: पूरग्रस्त घरांच्या संख्येवरून वाद -प्रतिवाद;महापालिकेचा हजार घरांचा अंदाज,तर पाच हजार घरे बाधित झाल्याचा नगरसेवकांचा दावा
    Satara Koyna Dam : ‘छत्रपती शिवाजी महाराज कोयना जलसागर’! साताऱ्यातील धरणाच्या जलाशयाला मिळाली नवी ओळख; सरकारचा मोठा निर्णय
    Sangli Crime : महावितरणच्या सबस्टेशनमध्ये दुचाकी चार्जिंग करण्यास विरोध, वॉचमनच्या मुलाच्या डोक्यात सणक गेली; ऑनड्युटी ऑपरेटरला संपवलं

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed