Authored byमानसी देवकर | महाराष्ट्र टाइम्स.कॉम17 Mar 2025, 5:55 pm
छ. संभाजीनगरमधील औरंगजेबाची कबर हटवण्याची मागणी राज्यात सुरू आहे. त्यातच नितेश राणे यांनी केलेल्या वक्तव्यामुळे नवा वाद ओढवला आहे. छ. शिवाजी महाराजांच्या सैन्यात मुस्लिम नव्हते असे वक्तव्य राणेंनी केले होते. महाराजांनी कायम हिंदू धर्म-संस्कृतीसाठी काम केले असे अतुल भातखळकर म्हणाले होते. यावरून अमोल मिटकरींनी राणे-भातखळकरांना इतिहास वाचण्याचा सल्ला दिला. औरंगजेबाच्या कबरीवरून महाराष्ट्राचे प्रश्न दुर्लक्षित केले जात असल्याचे मिटकरी म्हणाले.