Authored byसूरज सकुंडे | Contributed byस्वप्निल एरंडोलीकर | महाराष्ट्र टाइम्स.कॉम15 Mar 2025, 2:00 pm
स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीनं कार्यकर्त्यांकडून उदगाव येथे सांगली-कोल्हापूर रास्ता रोको करण्यात आला. पोलिसांनी बळाचा वापर करत रास्ता रोको मोडीत काढलाअनेक कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं. नागपूर-रत्नागिरी महामार्गासाठी संपादित करण्यात आलेल्या जमिनींना चौपट मोबादला मिळावा, अशी मागणी स्वाभिमानीनं केली होती. याशिवाय कृष्णा नदीवर बांधण्यात येणाऱ्या पुलाचे पिलर वाढवण्यात यावे, अशीही मागणी स्वाभिमानीनं केली.