Sanjay raut on devendra fadnavis : संजय राऊत यांनी सरकारवर टीका केली आहे. यावेळी त्यांनी म्हटले की, तुम्ही लोकांच्या स्वातंत्र्यावर गदा आणू शकत नाहीत. भाजपाचे स्वातंत्र्य महत्वाचे नाही, लोकांचे आणि देशाचे स्वातंत्र्य महत्वाचे असल्याचे राऊतांनी म्हटले. यावेळी त्यांनी बानवकुळे यांच्यावरही टीका केली.
राज्यात रोज आठ शेतकऱ्यांचा आत्महत्या
पुढे राऊत म्हणाले, राज्यात रोज आठ शेतकरी आत्महत्या करत आहेत. देशात रोज २२ शेतकरी आत्महत्या करत आहेत. मोदी हे गंगेचे पाणी घेऊन फिरत आहेत आणि इकडे शेतकरी आत्महत्या करत आहेत. देशाची सुरक्षा धोक्यात आलीये. देशाला विकले आहे. चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबद्दल मी मत व्यक्त करण्याइतके ते मोठे नाहीत. बावनकुळे यांनीही शिमगा साजरा करावा, असे म्हणताना राऊत दिसले.Satish Bhosle : प्रयागराजवरून अखेर ‘खोक्या’ला महाराष्ट्रात आणलं, सतीश भोसलेसह पोलीस बीडलानरेंद्र मोदी गंगाजल घेऊन फिरत आहेत
औरंगजेबाचे सोडा शेतकरी आत्महत्या करत आहेत, तिकडे बघा. औरंगजेबामुळे शेतकरी आत्महत्या करत आहेत का?. ते तुमच्यामुळे आत्महत्या करत आहेत, असे राऊतांनी सरकारला म्हटले. औरंगजेबाने जर अन्याय आणि अत्याचार केला आहे तर मग तुम्ही काय करत आहेत?. औरंगजेबाने जे केले ते केले, पण त्याच्यापेक्षाही तुमचा कार्यकाळ भयानक आहे. शेतकरी, महिला, बेरोजगार आत्महत्या करत आहेत.
देवेंद्र फडणवीस आणि सरकार फक्त घोषणा करते
पूर्वी वरिष्ठ नेत्यांच्या निवासस्थानी होळी साजरी होत, आता तसे राहिले नाही. होळी आणि शुक्रवारचा नमाज एका दिवशी आला तर काय हरकत आहे. विवाद निर्माण करण्याचे कारणच काय असाही प्रश्न यावेळी संजय राऊतांनी उपस्थित केला. राज्य अधोगतीला लागले आहे. आणीबाणीविरोधात भाजप काळा दिवस का साजरा करतंय, असेही राऊत म्हणाले. सरकारवर राऊतांनी गंभीर आरोप केल्याचेही बघायला मिळत आहे.