• Sun. Jun 14th, 2026

    Holi 2025: ‘हिंदू’च्या सणांमध्ये एकोप्याचा गोडवा! मुस्लिम कुटुंबाच्या तीन पिढ्या करताहेत होळीत ‘हार-कडे’

    Holi 2025: ‘हिंदू’च्या सणांमध्ये एकोप्याचा गोडवा! मुस्लिम कुटुंबाच्या तीन पिढ्या करताहेत होळीत ‘हार-कडे’

    Holi 2025: हिंदूच्या जिव्हाळ्याच्या सणांमध्ये दिवाळीत साखरेचा नारळ व बत्तासे, तर होळीत साखरेचे ‘हार-कडे’ तयार करून गोडवा पेरण्याचे काम मागील तीन पिढ्यांपासून मुस्लिम कुटुंब करीत आहे.

    महाराष्ट्र टाइम्स
    holi jalgaon story

    प्रवीण चौधरी, जळगाव: आज एकीकडे मनामनात जाती-धर्माच्या भिंती उभ्या राहत असतानाच दोन धर्मांमधील एकात्मतेची साक्ष देणारी प्रतीके कित्येक वर्षांपासून भक्कमपणे परंपरा जोपासत आहेत. याचे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे जळगाव जिल्ह्यातील अमळनेर येथील नासीर अजीज हलवाई यांचे कुटुंब होय. हिंदूच्या जिव्हाळ्याच्या सणांमध्ये दिवाळीत साखरेचा नारळ व बत्तासे, तर होळीत साखरेचे ‘हार-कडे’ तयार करून गोडवा पेरण्याचे काम मागील तीन पिढ्यांपासून मुस्लिम कुटुंब करीत आहे. व्यवसाय म्हणून नव्हे, तर एक परंपरा म्हणून हे काम करीत असल्याचे नासीर हलवाई सांगतात.

    नासीर हलवाई यांचे कुटुंब हे अमळेनर येथील रहिवासी आहे. मात्र, दिवाळीसाठी वीस दिवस व होळीसाठी तब्बल एक महिना ते कुटुंबासह जळगाव शहरात येतात. कासमवाडीत ते आपला कारखाना लावतात. दिवाळीत साखरेचे नारळ व बत्तासे तयार होतात. यंदाही हलवाई कुटुंबाने शिवरात्रीपासून आपला कारखाना सुरू केला आहे. कुटुंबातील सर्व सदस्य व दहा मजूर या ठिकाणी महिनाभर थांबतात. सध्या या कारखान्यात होळीसाठी लागणारे साखरेचे हार व कडे तयार केले जात आहेत. पारंपरिक लाकडी साच्यांमध्ये साखरेच्या पाकद्वारे तयार होणारे पदार्थ पाहत राहणेदेखील फारच सुखदायी आहे.
    घरातच खोदला वीस फूट खोल खड्डा; गुप्तधनासाठी लहान मुलीचा नरबळी देण्याचा प्रयत्न, जालन्यात भोंदूबाबाला अटक
    महिनभरात १०० क्विंटल साखर

    गेल्या ३५ वर्षांपासून हलवाई कुटुंबाच्या तीन पिढ्या जळगावात साखरेच्या गाठींचे हार-कडे बनवून हिंदू बांधवांच्या होळी सणाचा गोडवा वाढवत आहेत. जळगाव शहराही जिल्ह्याची मोठी बाजारपेठ असल्याने अमळनेरहून एका महिन्यांसाठी अजीज करीम हलवाई येतात. महिनाभरात या कारखान्यात तब्बल शंभर क्विंटल साखरेचे हार व कडे तयार केले जातात. विशेष म्हणजे, ते संपूर्ण खान्देशातील किरकोळ बाजारातील विक्रेत्यांकडून नेले जातात.
    सोलापुरात २८ वर्षीय तरुणाची निर्घृण हत्या; विवस्त्र करुन पाठीला लोखंडी सळीने दिलेले चटके, घटनेनं खळबळ
    ‘हार-कड्यांना विशेष महत्त्व’

    हिंदू धर्मात होळी, रंगपंचमी या सणांना अनन्यसाधारण महत्त्व आहे. होळी आणि रंगपंचमी म्हणजे एकमेकांतील भेदभाव विसरून एकत्र येत विविध रंगांची उधळण करण्याचा उत्सव आहे. होळीला साखरेचे हार व कड्‌यांचा नैवेद्य दिला जातो. गुढीपाडव्यालादेखील गुढीला साखरेचा हार घातला जातो. त्यामुळे हिंदू सणात होळीपासून ते गुढीपाडव्यापर्यंत हार-कड्यांना चांगलीच मागणी असते.

    किशोरी तेलकर

    लेखकाबद्दलकिशोरी तेलकर किशोरी तेलकर, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये कन्सल्टंट म्हणून कार्यरत असून पत्रकारितेमध्ये पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले आहे. ऑनलाइन माध्यमांमध्ये फ्रीलान्सिंगचा २ वर्षांचा अनुभव आहे आणि आता मटा ऑनलाइनमध्ये आहे. जनरल बातम्यासोबतच गुन्हेगारीविषयक बातम्यांमध्ये रस.… आणखी वाचा

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed