Sudhir Mungatiwar Speech in Assembly : सुधीर मुनगंटीवार यांना मंत्रिमंडळात स्थान न दिल्यामुळे ते नाराज असल्याची चर्चा सातत्याने समोर येत असते. विशेष म्हणजे मुनगंटीवार सध्या विविध मुद्द्यांवरुन सरकारला घेरताना दिसत आहेत. मुनगंटीवार यांनी आपल्या नाराजीच्या चर्चांवार आज भर विधानसभेत भाष्य केलं.
“कधीकधी पत्रकार विचारतात की तुम्ही नाराज आहात का? तेरे मासूम सवालों से परेशान हूं मैं. शेवटी आम्ही या सभागृहात कोणत्या पदावर जाण्यासाठी आलो नाहीत. निवडणूक जिंकणं हे आमचं लक्ष्य नाही. आमच्या मतदारसंघाच्या नागरिकांचं मन जिंकणं यासाठी आम्ही मुद्दे मांडतो”, असं सुधीर मुनंगटीवार म्हणाले.
सुधीर मुनगंटीवार यांच्या मंत्र्यांना सूचना
“मी उपमुख्यमंत्र्यांच्या लक्षात आणून देतो, खरंतर आपण काय लक्ष दिलं पाहिजे? आज राज्याचं उत्पन्न वाढू शकतं. महत्तम संसाधनाचा उपयोग करता येतो. आता साधे स्वत:च्या कराकडे आपल्याला लक्ष दिलं पाहिजे. 2017-18 मध्ये आपल्या स्वत:चा करवसूल जास्त होता. आता थोडा कमी झाला आहे. मग आपल्याला या संदर्भात जे अधिकारी चमकेश आहेत, त्यांना मोठ्या पदावर देता कामा नये. ते मंत्री आले की एकदम हाजी हाजी करतात”, असं मत सुधीर मुनगंटीवार यांनी मांडलं.
Maharashtra Politics : विधानसभेत हंगामा, सत्ताधारी सुधीर मुनगंटीवार यांनीच कृषीमंत्र्यांना सुनावलं
“काही अधिकारी असतात, जिथे ठेवणार तिथे काम करतात. अशा सर्व व्यवस्थेत आपल्याला उत्तम अधिकाऱ्यांची टीम तयार करता येईल का? जे अधिकारी टार्गेट पूर्ण करत नाहीत. मी उदाहरण देतो. 2023-24 मध्ये उत्पादन शुल्क विभागाचा रिव्हेन्यू हा 25500 कोटी रुपये आपण बजेटमध्ये सांगितला होता. पण प्रत्यक्षात किती आला तर 23222 कोटी रुपये आला. कारण काय? महाराष्ट्रात बनावट दारु इतक्या मोठ्या प्रमाणात विकली गेली, आपण ती दारु विकणारे कोण, त्यांना कुणाचा वरदहस्त आहे, त्यांचे पाय कायद्याच्या चौकटीतून तोडले पाहिजेत तर आपल्याला रिव्हेन्यू मिळेल”, असा सल्ला सुधीर मुनगंटीवार यांनी दिला.
“2024-25 मध्ये 3500 कोटी रुपये रिव्हेन्यू आपण अंदाजित धरला. कालच्या तारखेपर्यंत 21,900 कोटी रुपये, अध्यक्ष महोदय याकडे लक्ष दिलं पाहिजे की, भाजीमध्ये मीठा वाचवून, त्यामध्ये काटकसर करुन कोणताही फायदा होत नाही. त्यामुळे माझी मागणी आहे. अरे डेअरिंग करा, कर्जमुक्ती देण्यासाठी काय घाबरता? कर्जमुक्तीसाठी 20 हजार कोटी रुपये खर्च येतो”, असं रोखठोक मत सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केलं.

