• Sun. Mar 15th, 2026
    सरकार-पीक विमा कंपन्या शेतकऱ्यांना अडचणीत आणतात, एकही आमदार यावर बोलत नाही; राजू शेट्टींनी सरकारला घेरलं

    Raju Shetti on Farmers Crop Insurance : राजू शेट्टी यांनी सरकारवर शेतकऱ्यांच्या पीक विम्यावरुन टीका करत एकही आमदार यावर बोलत नसल्याचं म्हटलं आहे. सरकार आणि पीक विमा कंपन्या शेतकऱ्याला अडचणीत आणत असल्याचंही ते म्हणाले.

    Lipi

    धनाजी चव्हाण, परभणी : एकीकडे शेतीमाला भाव नसताना दुसरीकडे एक रुपयात पिक विमा योजना शासनाने आणली पण त्या पिक विमा योजनेचा देखील शेतकऱ्यांना फायदा होत नाही. कृषी मंत्र्यांनी शेतकऱ्यांची तुलना भिकाऱ्यासोबत करून एक प्रकारे शेतकऱ्यांचा अपमानच केला आहे. एक रुपयात पिक विमा देणे यामागे देखील सरकारचा हेतू वेगळाच होता, की शेतकऱ्यांनी नुकसान झाले तरी पिक विमा मिळवण्यासाठी आक्रोश करू नये. कारण शेतकऱ्याकडून पीक विम्याचा हप्ताच न घेतल्याने शेतकरी पिक विमाकडे दुर्लक्ष करतील, असा मानस सत्ताधाऱ्यांचा होता. गेल्या वर्षी शेतकऱ्यांना पिक विमा, खूप मोठी रक्कम आठ हजार कोटी मिळाले, पण यावर्षी मात्र अवघ्या ६८५ कोटी रुपयांमध्ये शेतकऱ्यांची बोळवण करण्यात आली आहे. महाराष्ट्राचं अर्थसंकल्पीय अधिवेशन चालू आहे पण एकही आमदार यावर बोलण्यास तयार नाही, असे म्हणत माजी खासदार राजू शेट्टी यांनी सरकारसह सर्वपक्षीय आमदारांवर जोरदार टीकेची झोड उठवली आहे.
    शेतकऱ्यांच्या जमिनी लाटण्याचा उद्योग, ५० हजार कोटींचा घोटाळा; शक्तीपीठ महामार्गावरुन राजू शेट्टींची टीका, संपूर्ण गणितचं सांगितलं
    स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष माजी खासदार राजू शेट्टी हे परभणी दौऱ्यावर आले होते. यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. पुढे बोलताना माजी खासदार राजू शेट्टी म्हणाले, की विमा कंपन्या म्हणतात की सरकारने पीक विम्याचा हप्ताच न दिल्यामुळे आम्हाला शेतकऱ्यांना पीक विम्याची रक्कम देण्यात अडचणी येत आहेत. सरकार या कंपन्यांना पिक विम्याचा हप्ता कधी देणार असा प्रश्न उपस्थित झाला. खरिपाच्या पिकाचे नुकसान होऊन तब्बल सहा महिने झाले आहेत. नियमानुसार नुकसानीचा आगरीन २५ टक्के रक्कम ही तात्काळ शेतकऱ्यांना द्यावी असा नियम आहे, पण सरकारनेच जर पिक विमा कंपन्यांना आपला हप्ता दिला नसेल तर पिक विमा कंपन्या देखील त्या आडून शेतकऱ्यांना पिक विम्याची रक्कम देत नाहीत. त्यामुळे सरकार आणि पीक विमा कंपन्या मिळून शेतकऱ्यांना चांगल्याच अडचणीत आणत आहेत.
    Baramati News : संतोष देशमुख हत्या प्रकरणाने संताप; पवारांच्या बारामतीत उद्या जनआक्रोश मोर्चा

    सोयाबीन पेंड निर्यातीतील अडथळे सरकारने दूर न केल्याने सोयाबीनचे भाव हमीभावापेक्षा कमी

    सातत्याने सोयाबीनची पेंड निर्यात व्हायची, त्यात अडथळे आणण्यात आले. त्याला प्रोत्साहन द्यायची गरज होती पण ते वेळेवर न केल्यामुळे सोयाबीनचा हमीभाव चार हजार नऊशे रुपये असताना आज सोयाबीन तीन हजार पाचशे ते तीन हजार सहाशे रुपये दराने विकावे लागत आहे. सरकारकडून सोयाबीन खरेदीच्या नावाखाली केवळ आणि केवळ फार्स केला गेला. खरेदी केंद्रावर शेतकऱ्यांनी नोंदणी करून रांगा लावायचा आणि शेतकऱ्यांसमोर दहा चाकी गाड्यातून व्यापाऱ्यांचे सोयाबीन बोगस सातबारा घेऊन जमा करून घ्यायचे.

    Raju Shetti : सरकार-पीक विमा कंपन्या शेतकऱ्यांना अडचणीत आणतात, एकही आमदार यावर बोलत नाही; राजू शेट्टींनी सरकारला घेरलं

    बारदाना उपलब्ध नाही, यंत्रणा नाही म्हणून शेतकऱ्यांचा सोयाबीन खरेदी करताना अडथळे निर्माण करण्यात आले आणि आता मुदत संपली म्हणून शेतकऱ्याचे सोयाबीन खरेदी करत नाहीत. त्यातच पुन्हा जे सोयाबीन विकत घेतले आहेत ते नाफेडकडून बाजारात विक्री करण्यात येत असल्याने शेतकऱ्यांकडे असलेल्या सोयाबीनला पुन्हा भाव मिळणार नाही, अशी अवस्था निर्माण झाली आहे. त्यामुळे सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांचे कंबरडेच मोडण्याचे काम सरकारने केले असल्याचे माजी खासदार राजू शेट्टी म्हणाले.

    करिश्मा भुर्के

    लेखकाबद्दलकरिश्मा भुर्केमहाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून कार्यरत. सामना, झी २४ तास, न्यूज १८ लोकमतसह ४ वर्ष पत्रकारिता क्षेत्रातील अनुभव. सामाजिक, मनोरंजन विश्लेषणात्मक लेखनाची आवड.… आणखी वाचा

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed