Suresh Dhas: सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा मुद्दा गेल्या तीन महिन्यांपासून राज्यात गाजत आहे. राज्यात महायुतीचं सरकार पुन्हा आलं आणि त्याचवेळी देशमुख हत्या प्रकरण घडलं. त्यामुळे नव्या सरकारला या प्रकरणाची जबरदस्त झळ बसली.
धनंजय मुंडे यांचा अतिशय निकटवर्तीय असलेल्या वाल्मिक कराडनं आवादा कंपनीकडे २ कोटी रुपयांची खंडणी मागितली होती. त्यावरुन कंपनीच्या अधिकाऱ्यांसोबत कराड आणि त्याच्या साथीदारांचा वाद झाला. कंपनीच्या प्रकल्पातील सुरक्षा रक्षकाला मारहाण झाली. त्यावेळी तिथे सरपंच संतोष देशमुख पोहोचले होते. प्रकल्प बंद पाडू नका. स्थानिकांना रोजगार मिळू द्या, असं देशमुख यांनी कराडच्या साथीदारांना सांगितलं. त्यावेळी देशमुख यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली. हा प्रकार ६ डिसेंबरला घडला आणि ९ डिसेंबरला देशमुखांचं अपहरण झालं. त्याच दिवशी त्यांची अतिशय निर्घृणपण हत्या केली.
Beed Crime: गरिबाला जबर मारहाण, कारमध्ये नोटांची बंडलं, सुरेश धसांसोबत फोटो; सतीश भोसले नेमका कोण?
देशमुख यांच्या हत्या प्रकरणात कराडसह त्याच्या ७ साथीदारांना अटक झाली. कराड हाच या हत्या प्रकरणाचा सूत्रधार असल्याचं एसआयटीनं आरोपपत्रात नमूद केलं आहे. देशमुख यांच्या हत्येचे फोटो ३ मार्चला समोर आले. देशमुखांची किती निर्घृणपणे, क्रूरपणे हत्या करण्यात आली, हे त्या फोटोंमधून दिसलं. त्यानंतर ४ मार्चच्या सकाळी मुंडेंनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला. यानंतर विधिमंडळाच्या आवारातील एक फोटो बराच गाजला.
विधिमंडळाचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु असताना भाजपचे आमदार सुरेश धस, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, आमदार जितेंद्र आव्हाड एका कट्ट्यावर बसून गप्पा मारत होते. सरपंच हत्या प्रकरणात धस सातत्यानं बोलत होते. त्यांनी मुंडे यांच्यावर कडाडून टीका केली. या प्रकरणाचा पाठपुरावा केला. जितेंद्र आव्हाड यांनीही हे प्रकरण लावून धरलं. पण जयंत पाटील या सगळ्यावर काहीच बोलले नाहीत. त्यामुळे मुंडे यांच्या राजीनाम्यानंतर विधिमंडळाच्या आवारात ३ नेत्यांमध्ये नेमकी काय चर्चा झाली, हा प्रश्न अनेकांना पडला. यावर धस यांनी सविस्तर भाष्य केलं आहे.
Walmik Karad: बंगला, फ्लॅट्स, शेतजमिनी अन् बरंच काही; कराडची संपत्ती किती? आरोपपत्रात चक्रावणारी माहिती
‘आमच्यात तशी फार विशेष चर्चा झाली नाही. पण एकमेकांसोबत बसलं पाहिजे. जयंत पाटील या प्रकरणावर काहीच बोलले नाहीत हे खरं आहे. राजीनाम्याला उशीर का झाला, या विषयावर आमची चर्चा सुरु होती. त्या दोघांनी पवार साहेबांसोबत काम केलेलं आहे. मी पण राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये होतो. पण त्यांच्या इतक्या वरिष्ठ पदावर नव्हतो. आम्ही खालीच राहायचो. आम्ही वरिष्ठ पातळीवर जातच नाही ना कधी. आमची लेव्हल खाली आहे,’ असं धस एका मुलाखतीत म्हणाले.

