Suresh Dhas: सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरण लावून धरत भाजप आमदार सुरेश धस यांनी धनंजय मुंडेंना अडचणीत आणलं. धस यांनी हत्या प्रकरण लावून धरल्यानंच मुंडे यांना मंत्रिपद सोडावं लागलं. पण धस यांच्या मनात राष्ट्रवादीचे दुसरे नेते छगन भुजबळ यांच्याबद्दलही प्रचंड राग आहे.
‘पुढील ५ वर्षे संसदीय कामकाजावर माझं लक्ष राहणार, ते अधिकाधिक चांगलं करण्याचा प्रयत्न करणार. सभागृहात चांगली भाषणं करणं, आपली कामगिरी उत्तम राखणं हेच आता माझं ध्येय आहे,’ असं धस म्हणाले. त्यावेळी त्यांना भुजबळांबद्दल विचारण्यात आलं. तेव्हा धसांनी भुजबळांबद्दलचे किस्से सांगितले. भुजबळांसोबत असलेल्या शत्रुत्वाबद्दल धस थेट बोलले.
मुंडेंचा राजीनामा अन् जयंत पाटील, आव्हाडांसोबत गप्पा; काय झाली चर्चा? धसांनी ‘विषय’ सांगितला
‘छगन भुजबळ माझ्याबद्दल बोलणारच ना. मी तर थेट त्यांचं नाव घेऊन सांगतोय ना तुरुंगात मी त्यांना भेटायला गेलेलो. पाच वर्ष त्यांनी माझं वाट्टोळ केलेलं आहे. भुजबळांनी माझं वैयक्तिक वाटोळे केलेलं आहे. माझ्या मतदारसंघात त्यांनी २००९ ते २०१४ या कालावधीत १ रुपयाचा निधी दिला नाही. मी २०१४ मध्ये पराभूत होण्यास भुजबळच कारणीभूत आहेत. २०१४ च्या निवडणुकीत मी त्यांच्यामुळेच पडलो,’ असं धस म्हणाले.
‘काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसचं सरकार असताना भुजबळ सार्वजनिक बांधकाममंत्री होते. अजित पवारांना उपमुख्यमंत्री करण्यासाठी स्वाक्षरी करण्यात आम्ही पुढे होतो. त्यांच्याकडे आम्ही तीनवेळा गेलो. पैसे द्या म्हटलं. निधी मागितला की ते म्हणायचे सही. आम्ही सरळ माणसं आहोत. अजितदादा उपमुख्यमंत्री व्हावेत यासाठी आम्ही एक नंबरला सही केली. भुजबळांच्या पुतण्यानं आणि पोरानं मागून ते बघितलं. त्यानंतर भुजबळांनी ५ वर्ष आमचा काटाच काढला आणि त्यांना काटा काढल्यामुळे आम्ही पण त्यांना तुरुंगात मुद्दामहून भेटायला गेलो होतो,’ असा किस्सा धस यांनी कथन केला.
Beed Crime: गरिबाला जबर मारहाण, कारमध्ये नोटांची बंडलं, सुरेश धसांसोबत फोटो; सतीश भोसले नेमका कोण?
‘छगन भुजबळ तुरुंगात होते. त्यावेळी एकदा त्यांना न्यायालयात आणलं होतं, तेव्हा मी तिकडे भेटायला गेलो होतो. लय भारी भावनेनं गेलो होतो. आजही खुलेपणानं सांगतो. ५ वर्ष भुजबळांनी माझा काटा काढला. माझ्या मतदारसंघात १ रुपयासुद्धा दिला नाही. भुजबळ काय सांगतात? भुजबळ फार खुनशी वागतात. म्हणून मी खुन्नस काढून त्यांना भेटायला गेलो. मी भुजबळांविरोधात केव्हाही खुन्नस काढणार, अगदी आयुष्यभर काढणार. जोपर्यंत ते आहेत आणि मी आहे तोपर्यंत तोपर्यंत काढणार. मला त्यांच्याबद्दल रागच आहे. पाडलं ना मला त्यांनी. माझी ५ वर्षे वाया घालवली. मग भुजबळांबद्दल गोड बोलायचं का?,’ असा सवाल धसांनी केला.

