शिवसेना ठाकरे गटाचे नेते आणि माजी आमदार वैभव नाईक यांनी फडणवीस सरकारवर टीकेची झोड उठवली.मंत्र्यांवरचे आरोप सिद्ध झाले, घोटाळे बाहेर अन् शिक्षाही झाली तरी राजीनामा घेतले नाहीत, असं वैभव नाईक म्हणाले. महिलांच्या सुरक्षिततेवरूनही वैभव नाईक यांनी सरकारला सुनावलं. ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांना आमिष दाखवून फोडलं जातंय, असा आरोप वैभव नाईकांनी केला.