Eknath Shinde on Mahayuti : गेल्या काही दिवसांपासून एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात शीतयुद्ध सुरु असल्याची चर्चा सातत्याने समोर येत आहे. याबाबत एकनाथ शिंदे यांना देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर महायुतीत शीतयुद्ध सुरु आहे का? असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर शिंदे यांनी सविस्तर भूमिका मांडली.
“आमचा अजेंडा हा ठरलेला आहे की, महाराष्ट्राच्या जनतेला काय मिळालं पाहिजे. आम्हाला काय मिळाल्यापेक्षा महाराष्ट्राच्या जनतेला काय मिळालं? हा मोठा विषय आहे. त्यामुळे महायुती आणि महाविकास आघाडीत फरक आहे. तुम्हाला विनंती आहे की, थोडी शाहानिशा करुन बातम्या दिल्या तर खूप चांगलं होईल. त्याने जनसामान्यांमध्ये आपली प्रतिमा चांगल होईल. कुठे चुकलं तर नक्की सांगा. पण सरकारने केलेले चांगलं काम आहे ते सांगा. तसेच विरोधकांनी केलेल्या आरोपांवर शाहानिशा करा”, असं एकनाथ शिंदे म्हणाले.
एकनाथ शिंदे यांचा विरोधकांना इशारा
“आमच्या दोघांवर गुन्हे दाखल करण्याची क्लिप समोर आली आहे. त्याप्रकरणी एसआयटी लावलेली आहे. त्या चौकशीत बरंच काही बाहेर येत आहे. मोठ्या प्रमाणात खळबळजनक काही गोष्टी आहेत. त्याही समोर येतील. पण आम्ही त्याबद्दल काही म्हणालो का? त्याचा अहवाल आल्यानंतर खरं समोर येईल. आम्ही कोणत्याही सूड भावनेतून कारवाई करणार नाहीत. आमच्याकडे कितीही बहुमत असलं तरी कुणावरही आकस बुद्धीने आम्ही कारवाई करणार नाहीत”, असं एकनाथ शिंदे म्हणाले.
Thane News : ठाण्यात ठाकरेंची शिवसेना विरुद्ध शिंदेंची शिवसेना, आनंद आश्रमासमोर अभूतपूर्व गोंधळ
“हे अधिवेशन अर्थसंकल्पीय अधिवेशन आहे. या महाराष्ट्रातील तमाम जनतेच्या दृष्टीने महत्त्वाचं अधिवेशन आहे. कारण महाराष्ट्राच्या तमाम जनतेने महायुतीला भरभरुन एवढं दिलं आहे. आम्हाला आता त्यांच्या ऋणातून उतराई व्हायचं आहे. त्यामुळे आम्हाला काम करायचं आहे. काम करताना विरोधी पक्ष आमच्यासोबत आला, सहकार्य केलं तर चांगलं आहे. त्यांचंही नाव होईल. त्यांच्याही मतदारसंघात न्याय मिळेलं. महाराष्ट्राला एक वेगळं चित्र पहायला मिळेल. संख्या आता कमी कमी होत कुठपर्यत आली ते बघा. त्यांनी आत्मपरिक्षण आणि आत्मचिंतन करावं”, असा टोला एकनाथ शिंदे यांनी लगावला.

