• Fri. Mar 13th, 2026

    Rahul Solapurkar : राहुल सोलापूरकर यांच्या नावाने पुन्हा राजकारण तापणार? जितेंद्र आव्हाड यांचं ट्विट करत आरोप

    Rahul Solapurkar : राहुल सोलापूरकर यांच्या नावाने पुन्हा राजकारण तापणार? जितेंद्र आव्हाड यांचं ट्विट करत आरोप

    Jitendra Awhad tweet about Rahul Solapurkar : छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबाबत वादग्रस्त वक्तव्य करणारे राहुल सोलापूरकर यांना मानाचं पान मिळाल्याची चर्चा आहे. राहुल सोलापूरकर यांची पुणे सांस्कृतीक धोरण समितीत सल्लागार म्हणून नियुक्ती केल्याची माहिती जितेंद्र आव्हाड यांनी दिली आहे. जितेंद्र आव्हाड यांनी ट्विट करत संताप व्यक्त केला आहे.

    महाराष्ट्र टाइम्स.कॉम

    पुणे : पुणे सांस्कृतीक धोरण समितीत अभिनेते राहुल सोलापूरकर यांचं सल्लागार म्हणून नाव आलं आहे, असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे. जितेंद्र आव्हाड यांनी ट्विट करत हा आरोप केला आहे. त्यामुळे या मुद्द्यावरुन आणखी राजकारण तापण्याची शक्यता आहे. राहुल सोलापूरकर यांनी याआधी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी केलेल्या एका वक्तव्यामुळे ते वादात सापडले होते. त्यानंतर त्यांच्याविरोधात कारवाई देखील करण्यात आली होती. त्यांना जबाबदार पदावरुन पायउतार व्हावं लागलं होतं. विशेष म्हणजे सोलापूरकर यांनी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयीदेखील वादग्रस्त वक्तव्य केल्याचं समोर आलं होतं. या दोन मुद्द्यांवरुन राजकारण तापलं असताना आता जितेंद्र आव्हाड यांनी नवा आरोप करत खळबळ उडवून दिली आहे.

    जितेंद्र आव्हाड नेमकं काय म्हणाले?

    “पुण्याचे सांस्कृतिक धोरण आणि अंमलबजावणी यासाठी एक समिती निर्माण करण्यात आली. या समितीमध्ये ‘थोर’ इतिहास संशोधक राहुल सोलापूरकर यांना संधी देण्यात आली. आता आपल्याला कळलेच असेल की, सोलापूरकर जे बोलतो ते कुणाच्या इशाऱ्यावर बोलतो आणि त्याला राजाश्रय कुणाचा आहे”, अशी टीका जितेंद्र आव्हाड यांनी केली आहे.

    नेमकं प्रकरण काय?

    राहुल सोलापूरकर यांनी एका पॉडकास्ट मुलाखतीत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या आग्र्यातील सुटकेच्या घटनेवर भाष्य केलं होतं. यावेळी शिवाजी महाराजांनी आग्र्यातून सुटका करुन घेण्यासाठी तिथल्या सैनिकांना लाच दिल्याचं वादग्रस्त वक्तव्य राहुल सोलापूरकर यांनी केलं होतं. यामुळे शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या होत्या. राहुल सोलापूरकर यांच्या विरोधात राज्यभरात आंदोलने झाली होती. यानंतर राहुल सोलापूरकर यांनी जाहीर माफी मागितली होती. पण त्यानंतर सोलापूरकर यांचं डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयीदेखील वादग्रस्त वक्तव्य समोर आलं होतं. या दोन्ही प्रकरणांमुळे राज्यातील वातावरण तापलं होतं. यानंतर जितेंद्र आव्हाड यांच्या नव्या ट्विटने वातावरण तापू शकतं.
    Suspense in Maharashtra Politics : ईव्हीएम घोटाळ्याचा आरोप करणाऱ्या आमदाराचाच अजित पवारांसोबत एकाच गाडीने प्रवास

    सोलापूरकरांच्या नियुक्तीने वादाची शक्यता

    राहुल सोलापूरकर यांची पुणे महापालिकेच्या सांस्कृतिक धोरण तज्ज्ञ सल्लागार पदी नियुक्ती करण्यात आली. त्यांच्या या नियुक्तीने नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. जितेंद्र आव्हाड यांनी ट्विट करत सोलापूरकर यांच्यावर टीका केली. तसेच “सोलापूरकर जे बोलतो ते कुणाच्या इशाऱ्यावर बोलतो आणि त्याला राजाश्रय कुणाचा आहे? हे आपल्याला आता कळलेज असेल”, असं जितेंद्र आव्हाड म्हणाले आहेत.

    चेतन पाटील

    लेखकाबद्दलचेतन पाटीलचेतन पाटील हे सध्या महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन टीममध्ये डिजीटल कंटेंट प्रोड्यूसर म्हणून कार्यरत आहेत. चेतन यांनी याआधी tv9 मराठी, News18 लोकमत, आपलं महानगर येथे काम केलं आहे.… आणखी वाचा

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed