• Sun. Mar 8th, 2026
    मुंबईचा पारा ३८ अंशावर, दोन दिवस उष्णतेची लाट

    Maharashtra Weather Forecast : राज्यातील काही भागांमध्ये आज आणि उद्या उष्णतेची लाटेची शक्यता आहे, तसा अंदाज हवामान खात्याकडून वर्तवण्यात आलाय. पुणे आणि कोकण विभागातही पारा चढला आहे. राज्यात अनेक भागात उन्हाची तीव्रता वाढताना दिसत आहे.यामुळे नागरिकांनी घराबाहेर पडताना काळजी घेणे आवश्यक आहे.

    महाराष्ट्र टाइम्स.कॉम

    मुंबई : गेल्या आठ दिवसांपासून पारा चांगलाच चढल्याचे बघायला मिळतंय. या तापमानाने नागरिक हैराण झाले आहेत. आज, मंगळवारी आणि उद्या, बुधवारी ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी, पुणे येथे तुरळक ठिकाणी उष्णतेच्या लाटेचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. बुधवारी सिंधुदुर्ग वगळता संपूर्ण कोकण विभागातच उष्णतेची लाट जाणवू शकते. मराठवाडा, पुण्यातही पारा चढताना दिसत आहे. यामुळे नागरिकांना काळजी घ्यावी लागणार आहे. विशेष: दुपारच्यावेळी घराच्या बाहेर पडताना.

    उष्ण आणि आर्द्रतापूर्ण वातावरण

    सोमवारी मुंबई, ठाणे, रायगड, रत्नागिरी परिसरामध्ये उष्ण आणि आर्द्रतापूर्ण वातावरण होते. सध्या ईशान्य ते पूर्व पट्ट्यातून वाऱ्यांची दिशा असल्याने तापमानामध्ये वाढ झाली आहे. सांताक्रूझ येथे सोमवारी ३८.४ अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली, तर कुलाबा येथे ३६.८ अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली. सोमवारसाठी उष्ण आणि आर्द्रतायुक्त वातावरणाचा इशारा दिला होता. दुसरीकडे पुण्यातही पारा चढला आहे. मुंबईमध्ये पुढील आठवडाभर ३६ अंशांच्या पलीकडे कमाल तापमान असू शकते तर पुढील चार दिवस ३७ ते ३८ अंशांदरम्यान तापमान नोंदले जाण्याची शक्यता आहे.
    मॅटचा दणका! निलंबित प्रशांत बेडसेंना पुन्हा नियुक्त करा, खेडच्या तहसीलदार ज्योती देवरे यांची नियुक्ती रद्द करण्याचे आदेशसोलापूर व नागपूरमध्ये तापमान 38 अंश सेल्सियसपर्यंत

    तापमानाने फेब्रुवारी महिन्यातच पस्तीशी ओलांडली असून सोलापूर व नागपूरमध्ये तापमान 38 अंश सेल्सियसपर्यंत पोहोचलं आहे. संभाजीनगरमध्येही उन्हाच्या झळा जाणून लागल्या आहेत. अलिकडे तिन्ही ऋतूंमध्ये बदल झाल्याचं पाहायला मिळते. होळीच्या अगोदरच यंदा पारा चढल्याचे बघायला मिळतंय. पुढील दोन दिवस नागरिकांनी घराबाहेर पडताना काळजी घ्यावी. घरातून बाहेर पडताना पाणीसोबत घेऊन पडावे.

    मंगळवार आणि बुधवार उष्णतेची लाट येण्याची दाट शक्यता

    मंगळवार आणि बुधवार उष्णतेची लाट येण्याची दाट शक्यता आहे. सोमवारी फक्त मुंबईच नाही तर कोकण विभागात देखील पारा चढल्याचे बघायला मिळाले. नांदेड, परभणी, जालना येथे ही पारा चढणार आहे. सध्याचे वातावरण बघता हे तर स्पष्ट झाले की, यंदा उन्हाळा काहीसा लवकरच सुरू झाला आहे. दुसरीकडे 26 फेब्रुवारीला पालघरमध्ये देखील उष्णतेच्या लाटेचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. यादरम्यान लोकांचा कलिंगड आणि द्राक्षे खरेदी करण्यावरही भर वाढला आहे.

    शितल मुंढे

    लेखकाबद्दलशितल मुंढेमहाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन टीममध्ये सिनिअर डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून कार्यरत. राजकीय, मनोरंजन, शिक्षण आणि क्राईम बातम्यांमध्ये विशेष आवड. लोकमत आणि टीव्ही 9 मराठीसह पत्रकारिता क्षेत्रात 6 वर्षांचा अनुभव.… आणखी वाचा

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed