• Mon. Jun 8th, 2026
    उर्दू शाळांमधील गैरव्यवहाराची गंभीर दखल, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची मोठी कारवाई

    | Contributed byआशिष मोरे | | Updated: 25 Feb 2025, 10:51 am

    devendra fadnavis ordered an inquiry: मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले की, “अल्पसंख्याक शाळांमध्ये शिक्षणाच्या नावाखाली मोठ्या प्रमाणावर गैरव्यवहार होत असल्याचे उघड झाले आहे. विद्यार्थी दर्जेदार शिक्षणापासून वंचित राहत आहेत. तर काही लोक शाळांच्या नावाखाली आर्थिक अपहार करत आहेत. याप्रकरणी सखोल चौकशी करण्यात येईल. आणि दोषींवर कठोर कारवाई केली जाईल.”

    महाराष्ट्र टाइम्स.कॉम

    जितेंद्र खापरे, नागपूर : महाराष्ट्रातील अल्पसंख्याक दर्जा प्राप्त उर्दू शाळांमध्ये भ्रष्टाचार, आर्थिक गैरव्यवहार आणि महिला शिक्षिकांच्या लैंगिक शोषणाच्या गंभीर तक्रारी समोर आल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याप्रकरणाची सखोल चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. महाराष्ट्र राज्य अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष प्यारे जिया खान (मंत्री दर्जा) यांनी नुकतीच मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घेऊन याप्रकरणी तातडीने कारवाईची मागणी केली होती. त्यांनी राज्यभरातील उर्दू शाळांमध्ये सुरू असलेल्या अनियमितता आणि भ्रष्टाचाराच्या गंभीर तक्रारींची माहिती मुख्यमंत्र्यांना दिली. यावर मुख्यमंत्री फडणवीस यांनी तातडीने चौकशीचे आदेश जारी केले.

    मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले की, “अल्पसंख्याक शाळांमध्ये शिक्षणाच्या नावाखाली मोठ्या प्रमाणावर गैरव्यवहार होत असल्याचे उघड झाले आहे. विद्यार्थी दर्जेदार शिक्षणापासून वंचित राहत आहेत. तर काही लोक शाळांच्या नावाखाली आर्थिक अपहार करत आहेत. याप्रकरणी सखोल चौकशी करण्यात येईल. आणि दोषींवर कठोर कारवाई केली जाईल.”

    अकोला जिल्ह्यातील शाळांमध्ये धक्कादायक प्रकार

    अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष प्यारे खान यांनी अलीकडेच अकोला जिल्ह्यातील काही उर्दू शाळांची पाहणी केली. त्यावेळी अलहाज सलीम जकारिया उर्दू वरिष्ठ प्राथमिक विद्यालयातील काही महिला शिक्षिकांनी शाळा संचालक विरुद्ध लैंगिक शोषणाच्या तक्रारी केल्या. तसेच, शिक्षकांच्या पगारातून अवैध कपात, शिक्षकांच्या जागी त्यांच्या नातेवाईकांची नेमणूक आणि अन्य वित्तीय गैरव्यवहाराचे अनेक प्रकार समोर आले.

    राज्यातील इतर जिल्ह्यांमध्येही तक्रारी वाढल्या

    अकोल्यानंतर राज्याच्या इतर भागांतील अल्पसंख्याक शाळांमधूनही अशाच प्रकारच्या तक्रारी येत असल्याचे आयोगाच्या अहवालात नमूद करण्यात आले आहे. अनेक शिक्षकांनी आयोगाच्या अध्यक्ष प्यारे खान यांच्याशी संपर्क साधून आपल्या तक्रारी मांडल्या आहेत. या सर्व घटनांची गांभीर्याने दखल घेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तातडीने सखोल चौकशीचे आदेश दिले आहेत. तसेच, राज्य मंत्री आशीष जयस्वाल यांच्याकडे याप्रकरणावर विशेष लक्ष ठेवण्याची जबाबदारी देण्यात आली आहे. चौकशी अहवाल आल्यानंतर दोषींवर कठोर कारवाई केली जाणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed