• Sun. Mar 15th, 2026
    Sharad Pawar: संमेलनात अशा वक्तव्यांची गरज नव्हती; ​शरद पवार यांचे नीलम गोऱ्हेंवर टीकास्त्र

    Sharad Pawar On Neelam Gorhe: अल्पावधीत आमदारकीच्या चार संधी कशा मिळाल्या, याची माहिती संपूर्ण महाराष्ट्राला आहे. अल्पावधीत चार पक्षांचा अनुभव गाठीशी असलेल्या गोऱ्हे यांनी अशाप्रकारचे वक्तव्य करायची गरज नव्हती,’ असे पवार म्हणाले.

    हायलाइट्स:

    • ‘चार वेळा आमदारकी कशी मिळवली, हे महाराष्ट्राला माहिती आहे’
    • शरद पवार यांचे नीलम गो-हे यांच्यावर टीकास्त्र
    • संमेलनाचा राजकीय हेतूने वापर नसल्याचे स्पष्टीकरण
    महाराष्ट्र टाइम्स
    gorhe pawar

    मुंबई : ‘साहित्य संमेलनात बोलताना प्रत्येकाने काही मर्याद पाळायला हव्यात,’ अशा शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी शिवसेना उबाठा पक्षावर केलेल्या आरोपांवर सोमवारी प्रतिक्रिया दिली. शिवसेनेच्या नेत्या नीलम गोऱ्हे यांनी दिल्लीमध्ये आयोजित मराठी साहित्य संमेलनामध्ये बोलताना, ‘उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत एका पदासाठी दोन मर्सिडीज द्यावा लागत होत्या,’ असे विधान केले होते. त्यांच्या या विधानानंतर राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले असून शिवसेना उबाठा पक्ष आक्रमक झाला आहे. आरोप-प्रत्यारोपांचे राजकारण रंगलेले असताना, मुख्यमंत्री फडणीस यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे.‘नीलम गोऱ्हे यांनी मर्यादित काळात चार वेळा आमदारकी मिळाली, ती कशी मिळवली याची संपूर्ण महाराष्ट्राला माहिती आहे. इतका प्रदीर्घ राजकीय अनुभव गाठीला असलेल्या गोऱ्हे यांनी साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावर अशा प्रकारची वक्तव्ये करण्याची गरज नव्हती. जर, अशी वक्तव्ये करायची होती तर त्यांनी संमेलनाला यायची गरज नव्हती,’ अशी स्पष्ट भूमिका राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि नवी दिल्ली येथील साहित्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष शरद पवार यांनी मांडली.
    घरगुती वादातून पती जीवावर उठला, पत्नीला कोल्ड्रिंकमधून पाजलं विष, छत्रपती संभाजीनगरात खळबळ
    ‘शिवसेनेत दोन मर्सिडीज कार दिल्या की, पद मिळत असे,’ असा दावा विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी साहित्य संमेलनादरम्यान केला होता. यावरून शिवसेना उबाठा पक्ष संतप्त झाला असून, साहित्य महामंडळ आणि शरद पवार यांनीही माफी मागावी, अशी मागणी खासदार संजय राऊत यांनी केली आहे.

    याबाबत शरद पवार यांनी सोमवारी नाराजी व्यक्त केली. ‘गोऱ्हे यांचा विधिमंडळातील प्रवेश प्रकाश आंबेडकर यांच्या पक्षामुळे झाला. त्यानंतर त्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गेल्या. त्यानंतर त्या शिवसेनेत आणि आता शिंदेंच्या शिवसेनेत आहेत. अल्पावधीत आमदारकीच्या चार संधी कशा मिळाल्या, याची माहिती संपूर्ण महाराष्ट्राला आहे. अल्पावधीत चार पक्षांचा अनुभव गाठीशी असलेल्या गोऱ्हे यांनी अशाप्रकारचे वक्तव्य करायची गरज नव्हती,’ असे पवार म्हणाले.
    महाकुंभमेळ्यात आतापर्यंत किती भाविकांनी स्नान केले? खुद्द योगींनीच सांगितला आकडा, म्हणाले…
    याविषयी संजय राऊत यांनी मांडलेली भूमिका योग्य असल्याचे शरद पवार यांनी एकीकडे मान्य केले. मात्र संमेलनाच्या व्यासपीठाचा राजकीय हेतूसाठी वापर झाल्याचा राऊत यांचा आरोप त्यांनी फेटाळून लावला. साहित्य संमेलन म्हटले की वाद आलेच, पण संमेलन आयोजकांनी याविषयी दिलगिरी व्यक्त केल्याने यावर पडदा टाकायला हरकत नाही, असेही पवार म्हणाले.

    उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सत्काराविषयीही पवार यांनी प्रथमच भाष्य केले. ‘तो पुरस्कार सोहळा राजकीय नव्हता. दिल्लीतील एका संस्थेने त्याचे आयोजन केले होते. त्यातही तो पुरस्कार १५ जणांना देण्यात आला, त्याची चर्चा झाली नाही. परंतु, मी शिंदे यांना पुरस्कार दिल्याची चर्चा झाली. मी कुणाचा सत्कार करायचा याची परवानगी घ्यायची का, याचा विचार यापुढे करावा लागेल,’ अशी कोपरखळीही त्यांनी राऊत यांचे नाव न घेता मारली.
    सत्ता येताच डोक्यात गेली हवा; डोनाल्ड ट्रम्प म्हणतात, भारताने अमेरिकेचा खूप गैरफायदा घेतला
    शरद पवारांवर राऊत यांची टीका

    ‘दिल्लीतील साहित्य संमेलनात विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांच्या वक्तव्याने जी चिखलफेक झाली, त्याची जबाबदारी संमेलनाचे स्वागताध्यक्ष असलेले शरद पवारदेखील नाकारू शकत नाहीत,’ असे वक्तव्य करून शिवसेना उबाठा पक्षाचे नेते संजय राऊत यांनी सोमवारी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांना लक्ष्य केले. महाराष्ट्रातील प्रमुख नेत्यांवर चिखलफेकीसाठी दिल्लीत साहित्य संमेलन भरवले आहे का, असा सवाल राऊत यांनी केला. ‘संमेलनाच्या व्यासपीठावरून करण्यात आलेल्या चिखलफेकीचा संमेलनाच्या अध्यक्ष तारा भवाळकर यांनी आणि शरद पवार यांनीही निषेध व्यक्त केला पाहिजे,’ असेही राऊत म्हणाले.

    शंभुराज देसाई यांचा नकार

    नीलम गोऱ्हे यांच्या वक्तव्यांवर प्रतिक्रिया देण्यास मंत्री शंभुराज देसाई यांनी नकार दिला. ‘गोऱ्हे या उपसभापती आहेत, त्यांच्या वक्तव्यावर बोलताना संसदीय मर्यादा पाळायला हवी. म्हणून मंत्री म्हणून मी बोलणार नाही,’ असे ते म्हणाले.

    किशोरी तेलकर

    लेखकाबद्दलकिशोरी तेलकर किशोरी तेलकर, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये कन्सल्टंट म्हणून कार्यरत असून पत्रकारितेमध्ये पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले आहे. ऑनलाइन माध्यमांमध्ये फ्रीलान्सिंगचा २ वर्षांचा अनुभव आहे आणि आता मटा ऑनलाइनमध्ये आहे. जनरल बातम्यासोबतच गुन्हेगारीविषयक बातम्यांमध्ये रस.… आणखी वाचा

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *