• Tue. Jun 16th, 2026

    ‘मस्ती केल्यास घरी जाणार, मुख्यमंत्र्यांनी दिला दम, आमचे पीएस आणि ओएसडी तेच ठरवतात’, कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांचं वक्तव्य

    ‘मस्ती केल्यास घरी जाणार, मुख्यमंत्र्यांनी दिला दम, आमचे पीएस आणि ओएसडी तेच ठरवतात’, कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांचं वक्तव्य

    कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबाबत जे वक्तव्य केलं आहे त्याची राजकीय वर्तुळात चर्चा होत आहे. मुख्यमंत्र्यांनी सर्व मंत्र्यांना मस्ती केल्यास घरी जाणार असा दम दिल्याचं माणिकराव कोकाटे म्हणाले. तसेच आमचे पीएस आणि ओएसडी तेच ठरवतात, असंदेखील माणिकराव कोकाटे म्हणाले.

    महाराष्ट्र टाइम्स.कॉम

    नाशिक : राज्याचे कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्रिमंडळातील सर्व मंत्र्यांना दम दिल्याचं कोकाटे म्हणाले आहेत. चांगलं काम करण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी दम दिल्याचं माणिकराव कोकाट यांनी सांगितलं. ते महायुती सरकारच्या कार्यप्रणालीबाबत बोलत होते. मुख्यमंत्री यांच्या हाती सर्व अधिकार आहेत. मुख्यमंत्र्यांनी सरकार स्थापनेनंतर 100 दिवसांचा कार्यक्रम देण्याच्या सूचनाही केल्या. तसेच कार्यक्रम दिला आणि कामामध्ये मस्ती केल्यास घरी जाणार असा मुख्यमंत्र्यांनी दम दिल्याची माहिती माणिकराव कोकाटे यांनी दिली.

    विशेष म्हणजे पीएस आणि ओएसडी मुख्यमंत्रीच ठरवत असल्याने आमच्या हातात काहीही नाही, असंदेखील माणिकराव कोकाटे म्हणाले आहेत. त्यांच्या या वक्त्वाची सध्या राजकीय वर्तुळात चर्चा सुरु आहे. माणिकराव कोकाटे हे महायुती सरकारच्या कामांचं कौतुक करत आहेत की उद्विग्नता व्यक्त करत आहेत तेच कळत नसल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आता सुरु झाली आहे.

    माणिकराव कोकाटे नेमकं काय म्हणाले?

    “अतिशय उत्कृष्ठ असं काम झालं. बहुमताने आम्ही जिंकून आलो. जिंकून आल्यानंतर पहिल्याच दिवशी मुख्यमंत्र्यांनी दम दिला. आता तुमच्या कुणाच्या जाण्यामुळे सरकारवर काही परिणाम होणार नाही. माझ्यासह! त्यामुळे जास्त मस्ती कराल तर घरी जाल. डिपार्टमेंटचं काम शिस्तित लागलं पाहिजे. शंभर दिवसांचा कार्यक्रम दिला. आमचे पीएस आणि ओएसडी सुद्धा मुख्यमंत्री ठरवतात. हे पण सांगतो तुम्हाला. आमच्याही हातात काही राहिलं नाही. त्यामुळे आम्हाला नीट काम करावंच लागेल”, असं माणिकराव कोकाटे म्हणाले.
    शिंदेंच्या निर्णयांना स्थगिती, दादांनी पत्र पाठवताच फिरली जादुची कांडी; CMनं लगेच आदेश काढले

    माणिकराव कोकाटे वादाच्या भोवऱ्यात

    कृषीमंत्री माणिकराव कोकाट नुकतंच कोर्टाच्या सुनावणीमुळे वादात सापडले आहेत. कोर्टाने 1995 च्या प्रकरणात माणिकराव कोकाटे यांना 2 वर्षांची शिक्षा सुनावली आहे. या प्रकरणी त्यांची आमदारकी धोक्यात येऊ शकते, अशी चर्चा आहे. तसेच माणिकराव कोकाटे यांनी शेतकऱ्यांच्या पीक विमाबाबत केलेल्या एका वक्तव्यावरुनही ते वादात सापडले आहेत. यानंतर आता त्यांनी महायुतीच्या कार्यप्रणालीवर बोलताना मोठं वक्तव्य केलं आहे. त्यांच्या वक्तव्याचा नेमका कसा अर्थ काढायचा? अशी चर्चा देखील राजकीय वर्तुळात सुरु आहे.

    चेतन पाटील

    लेखकाबद्दलचेतन पाटीलचेतन पाटील हे सध्या महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन टीममध्ये डिजीटल कंटेंट प्रोड्यूसर म्हणून कार्यरत आहेत. चेतन यांनी याआधी tv9 मराठी, News18 लोकमत, आपलं महानगर येथे काम केलं आहे.… आणखी वाचा

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed