• Sat. Sep 5th, 2026

माणिकराव कोकाटे यांच्या राजीनाम्यासाठी जितेंद्र आव्हाड आक्रमक, राहुल नार्वेकरांना पाठवले निकालपत्र

माणिकराव कोकाटे यांच्या राजीनाम्यासाठी जितेंद्र आव्हाड आक्रमक, राहुल नार्वेकरांना पाठवले निकालपत्र

महाराष्ट्र टाइम्स.कॉम | Updated: 23 Feb 2025, 1:14 pm

जितेंद्र आव्हाड यांनी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या राजीनाम्याची मागणी केलीये. त्यांनी एक पत्र आणि निकालपत्र राहुल नार्वेकरांना पाठवले आहे. एखादा आमदार असता तर ठिक होते, पण ते मंत्री असल्याचे सांगत त्यांचा राजीनामा घेतला पाहिजे, असे म्हणताना जितेंद्र आव्हाड हे दिसले आहेत.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम

मुंबई : आमदार जितेंद्र आव्हाड हे धनंजय मुंडे यांच्यानंतर आता माणिकराव कोकाटे यांच्या राजीनाम्याबद्दल आक्रमक भूमिका घेताना दिसत आहेत. त्यांनी कोकाटे यांच्या राजीनाम्याबद्दल विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांना पत्रासोबत निकालपत्र पाठवले आहे. जितेंद्र आव्हाड याबद्दल बोलताना म्हणाले की, कोर्टाने जे काही म्हणणे मांडले आहे ते अतिशय गंभीर आहे, याचा विचार करणे गरजेचे आहे. कोर्टाने म्हटले आहे की, आरोपी क्रमांक एक म्हणजेच माणिकराव कोकाटे हे एक राजकारणी असून आणि वकिल असून त्यांना गुन्हांची माहिती असतानाही त्यांनी हे कृत्य केले. वैयक्तीक लाभापोटी योजनेतील मालमत्ता हडप केली.

जितेंद्र आव्हाड पुढे म्हणाले, कोर्टाने जे म्हटले ते महाराष्ट्राच्या राजकिय संस्काराला डाग लावल्यासारखे आहे. कोर्टाने म्हटले की, मंत्री असल्याने प्रतिष्ठा खराब होऊ शकते. बेकायदेशीर कृत्य केल्याने कायदा त्यांना माफ करू शकत नाही. कोणीही असले तरीही हा फसवणुकीचा गुन्हा माफ करणे योग्य नाही, हा संदेश देणे आवश्यक आहे. ज्यावेळी कोर्ट म्हणते की, संदेश देणे आवश्यक आहे. त्यावेळी विधीमंडळाचेही काम आहे फसवणुकीच्या गुन्हामध्ये प्रचलित कायद्यानुसार राजीनामा घ्यायलाच हवा.

Jitendra Awhad

आतापर्यंत ज्या भारतभर घटना घडल्या आहेत. त्यामध्ये तुम्ही राहुल गांधींना घरी पाठवल. कोकाटे मंत्री आहेत, नुसते आमदार असते तर ठीक होते. मंत्रिमंडळात बसलेला मुख्यमंत्र्यांच्या मांडाला मांडी लावून बसलेला माणूस हा कायद्याने गुन्हेगार सिद्ध झालाय. त्यावर अभ्यास करून निर्णय घेणे आवश्यक असल्याचेही जितेंद्र आव्हाड यांनी म्हटले. तुम्ही राहुल गांधींना घरी पाठवले, तुम्ही सुनील केदारला घरी पाठवले, तुम्ही अनेक अशा कारवाई केल्या.
महायुतीत संघर्ष?, मंत्री मेघना बोर्डीकरांचा निशाणा नेमका कोणावर, भर सभेत म्हणाल्या…इथे त्यांना निकालपत्रच मिळाले नाही, मी त्यांना निकालपत्र देतोय. ज्यांनी हे आरोप केले, ज्यांनी ही केस केली, ते वंजारी समाजाचे मोठे नेते तुकाराम दिघोळे यांचा त्यांनी काल पत्रकार परिषदेमध्ये अरे तुरे उल्लेख केला आणि आज त्यांचा स्मृती दिन आहे. एखाद्या वयोवृद्ध मानसाला आणि तो आपल्या नाहीये, त्याला अरे तुरे म्हणण हा सत्तेचा माज असतो. यातून तुमचे संस्कार दिसतात. ऐ तुकाराम हे काही शब्द झाले का?, असेही जितेंद्र आव्हाड यांनी म्हटले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed