Sanjay Raut ON ST Bus Karnataka Row : कर्नाटकमध्ये महाराष्ट्रातील बस चालकाला मारहाण झाल्यानंतर शिवसैनिकांनी कर्नाटकच्या बसेसना काळं फासलं. संजय राऊत यांनी मुख्यमंत्री शिंदेवर निशाणा साधला, पंतप्रधान आणि गृहमत्र्यांनी दोन्ही राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना बोलावण्याची मागणी राऊतांनी केली.
आम्ही जेलमध्ये गेलो, अटक झाल्या होत्या. अजूनही खटले सुरू आहेत. ते जे आंदोलन म्हणत आहेत त्या आंदोलनात ४० लोकांची यादी आहे पण त्यामध्ये शिंदेंचं नाव कधी दिसलं नाही. जसं भाजपचं स्वातंत्र्यलढ्यात दिसलं नाही तसंच एकनाथ शिंदे कोणत्याही लढ्यात, संघर्षात आणि तुरूंगात त्यांचं नान नव्हतं. बेळगावचे ते मंत्री असताना ते कधी त्या भागात गेले नाहीत. त्यांच्याकडे मंत्री म्हणून सीमााभागाचा कार्यभार होता तेव्हा हे गेले नाहीत त्यांच्याकडून काय अपेक्षा. कारण उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असतानाही त्यांच्याकडे सीमाप्रश्नाचा आणि सीमाभागाचा विेशेष कार्यभार होता तेव्हाही ते गेले नसल्याचं म्हणत राऊतांनी शिंदेंवर निशाणा साधला.
दोन्ही मुख्यमंत्र्यांना बोलावालं पाहिजे, सुप्रिम कोर्टाच हा विषय चालू आहे. न्यायालय निर्णय देईल, पण असा हल्ला का करावा? महाराष्ट्रामध्ये अनेक कर्नाटकचे लोकं आहेत, पण आम्ही असं कधी केलं नाही ना करणारही नाही. देशाच्या पंतप्रधान आणि गृहमंत्र्यांनी दोन्ही राज्याच्या मुख्यमंत्र्यांना बोलावलं पाहिजे आणि या विषयावर बोलायला हवं, असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.
दरम्यान, उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना संजय राठोड यांचा राजीनामा घेतला. नैतिकता या सरकारच्या आसपासही फिरकत नाही. देवेंद्र फडणवीस आणि भाजपने मागणी केली होती. आता तेच त्यांच्या मांडीवर बसले आहेत. ज्यांच्यावर तुम्ही आरोप केलेत खून, बलात्कार, त्यावेळी फडणवीस विरोधी पक्षनेते होते. ठाकरे सरकारमधील मंत्र्यांची राजीनामा मागितले होते. कोर्टाने ज्यांना भ्रष्टाचारी ठरवलं आहे आणि शिक्षा ठोठावली आहे, त्यांच्या बाबतीत फडणवीस गप्प का? भाजप नैतिकेच्या गोष्टी करत असतं, त्यांच्या आसपासही नैतिकत फिरकत नाहीये आणि भाजपला घाबरत असल्याचं राऊत म्हणाले.

