Vasai Virar News: तलावांतील पाण्याची पातळी वाढवून त्याची गुणवत्ता आणि जैवविविधता टिकवण्यासाठी पालिकेने या तलावांचे नैसर्गिक संवर्धन करण्याचे ठरवले आहे. यासाठी प्राथमिक तत्त्वावर आठ आणि इतर तलावांचे काम हाती घेण्यात येणार आहे.
वसई-विरार महापालिका हद्दीत अनेक लहान-मोठे तलाव आहेत. या तलावांचे पालिकेतर्फे, तसेच राज्य सरकारच्या तलाव संवर्धन योजेनेतून सुशोभीकरण करण्यात आले आहे. सध्या यातील ५९ तलावांचा वापर हा मत्स्योत्पादनासाठी करण्यात येत आहे. या तलावांचा ई-लिलाव करून ते मत्स्य शेतीसाठी उपलब्ध करून देण्यात येतात. त्यातून पालिकेला चांगले उत्पन्न मिळते. मात्र, सद्यस्थितीत यातील काही तलावांचे पाणी दूषित झाले आहे. त्यामुळे वारंवार या पाण्याचे शुद्धीकरण करणे शक्य नसल्याने या तलावांचे वर्षांनुवर्षे नैसर्गिकरीत्या शुद्धीकरण होत राहील, अशी उपाययोजना पलिकेतर्फे करण्यात येणार आहे.
पिता मरणपंथाला, पोटच्या तीन पोरींनी मृत्यूपत्रावर अंगठ्याचे चोरुन ठसे घेतले, पुण्यातील प्रकार
यामध्ये प्राथमिक तत्त्वावर रनाळे तलाव, टाटोळे तलाव, आचोळे तलाव, चक्रेश्वर तलाव, राममंदिर तलाव, वालिव तलाव, गास तलाव, गोखिवरे आणि माणिकपूर तलाव यांसह इतर काही तलावांचे नैसर्गिकरित्या संवर्धन करण्यात येणार आहे. सद्यस्थितीत पाणी प्रदूषित असल्याने त्याचा परिणाम हा जैवविविधतेवर होत असून, दुसरीकडे तलावातून दुर्गंधी देखील येत आहे. यामुळे नागरिकांनी तलावाजवळ असलेल्या पदपथावर चालणेही जिकरीचे झाले आहे.
केशर शेतीतून थेट ५० लाखांची कमाई, नागपूरच्या युवा दाम्पत्याची कमाल, उष्ण वातावरणातही यशस्वी प्रयोग
या करण्यात येणाऱ्या नैसर्गिक संवर्धनामुळे तलावातील पाण्याची कोणतीही हानी होणार नाही, तसेच पाण्याचे शुद्धीकरण होऊन जैवविविधता टिकवण्यास मदत होणार असल्याचा विश्वास पालिकेचे उपायुक्त समीर भूमकर यांनी व्यक्त केला आहे. यासाठी लवकरच निविदा काढण्यात येणार आहे.
Aditya Thackeray: शिंदे केवळ मलिदा खाण्यातच पटाईत; किनारा मार्गावरील तड्यांवरुन आदित्य ठाकरेंची टीका
असे होणार संवर्धन
■ दूषित पाण्यातील ऑक्सिजनचे प्रमाण वाढवण्यात येणार
■ विघातक रसायने नष्ट करणार
■ पाण्यातील शेवाळ, तसेच पाण्यात विरघळलेला नत्र (नायट्रोजन) आणि स्पूरद (फॉस्फरस) जैविक प्रक्रियेद्वारे कमी करणार
■ पाण्यातील अतिउपयोगी नैसर्गिक सूक्ष्म जीवांवर डोसिंग प्रक्रिया करणार
■ पाण्याची गुणवत्ता वाढवण्यात येणार
तलावांचे नैसर्गिक पद्धतीने संवर्धन करण्यात येणार आहे. तलावातील पाण्याची गुणवत्ता टिकवणे महत्त्वाचे असून, यामुळे जमिनीत शुद्ध पाणी मुरले जणार आहे. तसेच तलावाच्या आजूबाजूला असलेले पाण्याचे इतर झरेही शुद्ध राहण्यास मदत होणार आहे. –अनिलकुमार पवार, आयुक्त वसई-विरार महापालिका

