• Tue. Mar 10th, 2026
    Mumbai: डांबरीकरणामुळे पालिका कोंडीत; सागरी किनारा मार्गाबाबत भाजप नेत्याकडून ऑडिटसह चौकशीची मागणी

    Mumbai Coastal Road: महापालिकेने शुक्रवारी स्पष्टीकरण देत सागरी किनारा मार्गाचे स्वरूप पूर्ववत केले जाणार असल्याचे जाहीर केले. तरी या प्रकरणाची ऑडिटसह चौकशीची मागणी भाजपच्या नेत्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली.

    महाराष्ट्र टाइम्स
    mumbai coastal road2

    मुंबई : सागरी किनारा मार्गावरील हाजीअली ते वरळी या दरम्यान पुलाचे सांधे मजबूत राहावेत, यासाठी रस्त्याच्या काही भागावर गेल्या वर्षी केलेले मास्टिक आवरण (डांबरीकरण) अद्याप कायम असल्याचे गुरुवारी समोर आले. यानंतर मुंबई महापालिकेची कोंडी झाली आहे. यावर महापालिकेने शुक्रवारी स्पष्टीकरण देत सागरी किनारा मार्गाचे स्वरूप पूर्ववत केले जाणार असल्याचे जाहीर केले. तरी या प्रकरणाची ऑडिटसह चौकशीची मागणी भाजपच्या नेत्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली.

    डांबरीकरणाबाबतचा व्हिडीओ गुरुवारी सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर पंतप्रधान कार्यालय आणि राज्य सरकारनेही सागरी किनारा मार्गावरील डांबरीकरणाची माहिती घेतली. त्यानंतर ‘मुंबई सागरी किनारा मार्गांतर्गत उत्तर दिशेने जाणारा मार्ग (चौपाटी ते वरळी) हा जुलै २०२४मध्ये वाहतुकीसाठी खुला करण्यात आला. त्यापूर्वीच त्याचे डांबरीकरण करण्यात आले होते. डांबरीकरणाच्या काही भागामध्ये सांधे रुंद झाले होते. ते आणखी रुंद होऊ नयेत अणि डांबरीकरण मजबूत राहावे, टिकावे, यासाठी त्यावर अतिरिक्त मास्टिकचे आवरण ठिकठिकाणी करण्यात आले. पावसाळा सुरू झाल्यानंतर सततच्या आणि जोरदार पावसामुळे डांबरीकरणाचे नुकसान होऊ नये, रस्त्यावर खड्डे होऊ नयेत, हा त्यामागचा हेतू आहे. त्यामुळे प्रकल्पाच्या बांधकामात कोणताही दोष नाही,’ असे महापालिकेने स्पष्ट केले आहे. त्यानंतरही मुंबई महापालिकेला टीकेला सामोरे जावे लागल्याने महापालिकेने १५-२० दिवसांत सागरी किनारा मार्गाचे स्वरूप पूर्ववत केले जाणार असल्याचे जाहीर केले.
    Aditya Thackeray: शिंदे केवळ मलिदा खाण्यातच पटाईत; किनारा मार्गावरील तड्यांवरुन आदित्य ठाकरेंची टीका
    काही मंत्री व त्यांचे लाडके कंत्राटदार केवळ रस्त्यावरचा मलिदा खाण्यातच पटाईत आहेत. आमचे सरकार असते, तर उत्तम गुणवत्तेचा सागरी किनारा सन २०२३मध्येच पूर्ण झाला असता आणि आजवर सायकल ट्रॅक, बागा तयार होऊन खुल्या झाल्या असत्या. – आदित्य ठाकरे, आमदार
    संतापजनक! महाकुंभात महिलांच्या स्नानाचे VIDEO शूट, चॅनेलला विकले, प्रसिद्ध यूट्यूबरसह तिघं अटकेत
    इतक्या महत्त्वाच्या प्रकल्पात हलगर्जी होऊन खड्डे पडतात, हे चुकीचे आहे. मुख्यमंत्र्यांनी या कामाचे ऑडिट करून घ्यावे आणि दोषी व्यक्तींचा शोध घेऊन त्यांच्यावर कारवाई करण्यासाठी विशेष समिती स्थापन करावी. – रवी राजा, उपाध्यक्ष, मुंबई

    किशोरी तेलकर

    लेखकाबद्दलकिशोरी तेलकर किशोरी तेलकर, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये कन्सल्टंट म्हणून कार्यरत असून पत्रकारितेमध्ये पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले आहे. ऑनलाइन माध्यमांमध्ये फ्रीलान्सिंगचा २ वर्षांचा अनुभव आहे आणि आता मटा ऑनलाइनमध्ये आहे. जनरल बातम्यासोबतच गुन्हेगारीविषयक बातम्यांमध्ये रस.… आणखी वाचा

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed