• Mon. Mar 16th, 2026

    पक्षाच्या दबावाला बळी न पडता धनंजय मुंडेंची भेट नाकारायला हवी होती, मनोज जरांगे पाटलांकडून सुरेश धस यांचा समाचार

    पक्षाच्या दबावाला बळी न पडता धनंजय मुंडेंची भेट नाकारायला हवी होती, मनोज जरांगे पाटलांकडून सुरेश धस यांचा समाचार

    Manoj Jarange Patil on Suresh Dhas : सुरेश धस यांनी धनंजय मुंडेंची भेट घेतल्यानंतर मनोज जरांगे पाटील यांनी धस यांचा समाचार घेतला असून त्यांनी मुंडेंची भेट नाकारायला हवी होती, असं म्हटलं आहे.

    पक्षाच्या दबावाला बळी न पडता धनंजय मुंडेंची भेट नाकारायला हवी होती, मनोज जरांगे पाटलांकडून सुरेश धस यांचा समाचार

    धनाजी चव्हाण, परभणी : सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणावरुन मराठा समाजाने आमदार सुरेश धस यांना डोक्यावर घेतले होते. कधी नव्हे तो मराठा समाजाने राजकारण्यावर विश्वास ठेवला होता. पण आमदार सुरेश धस यांनी मंत्री धनंजय मुंडे यांची गोपनीय बैठक घेतल्याचे समोर आल्यानंतर मात्र संपूर्ण मराठा समाजाचा त्यांच्यावरील विश्वास उडाला आहे. मीदेखील सुरेश धस यांच्यावर प्रचंड प्रेम केले. पण माझा देखील त्यांनी विश्वासघात केला आहे. आमदार सुरेश धस यांच्यावर पक्षाचा दबाव जरी असला तरी त्यांनी मंत्री धनंजय मुंडे यांची भेट नाकारायला हवी होती. तसेच त्यांनी आमदारकीचा राजीनामा देऊन जनतेसमोर हे सर्व मांडले असते तर मतदारांनी त्यांना पुन्हा एकदा दोन लाख मतांनी विजयी केले असते असे म्हणत मनोज जरांगे पाटील यांनी आमदार सुरेश धस याचा चांगलाच समाचार घेतला आहे. मनोज जरांगे पाटील परभणी येथील डॉक्टर जगदीश शिंदे यांच्या जीवन हॉस्पिटलच्या उद्घाटन समारंभाला उपस्थित होते त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
    मनोज जरांगे यांची धनंजय मुंडेंवर सडकून टीका, मंत्रिपदाचा राजीनामा न देण्यावरुन घेरलं, म्हणाले, ‘हापापलेला माणूस…’
    पुढे बोलताना मनोज जरांगे पाटील म्हणाले की, सुरेश धस यांनी मीडिया समोर यायला पाहिजे होते आणि जनतेला सांगायला पाहिजे होते की पक्षाने माझ्यावर दबाव आणला आहे आणि धनंजय मुंडे यांना भेटून आपापसात मिटवून घेण्याचे सांगितले जात आहे. त्यांनी असे करून जर समाजाला विश्वासात घेतले असते तर त्यांच्यावरचा आणखीन विश्वास समाजात वाढला असता. पण त्यांची आणि धनंजय मुंडे यांची झालेली गुप्त बैठक जेव्हा बाहेर पडली त्यावेळेस मात्र त्यांच्यावरचा विश्वास सर्वांचाच उडाला आहे. आमदार सुरेश धस यांनी असे करायला नको होते म्हणत मनोज जरांगे पाटील यांनी त्यांच्याविषयी आणखीन बोलणे टाळले.

    पक्षाच्या दबावाला बळी न पडता धनंजय मुंडेंची भेट नाकारायला हवी होती, मनोज जरांगे पाटलांकडून सुरेश धस यांचा समाचार

    २५ फेब्रुवारीपर्यंत मुख्यमंत्री फडणवीस तीनही गॅझेट लागू करतील आणि आम्ही त्यांचा भव्य सत्कार करू –

    हैदराबाद, सातारा आणि मुंबई गॅझेट हे शिंदे समितीने सात महिन्यापूर्वीच अभ्यासाला घेतले आहे. येणाऱ्या २५ फेब्रुवारी रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे तीनही गॅझेट लागू करतील आणि त्यानंतर आम्ही मुख्यमंत्री फडणवीस यांचा भव्य असा सत्कार करू असा विश्वास मनोज जरांगे पाटील यांनी व्यक्त केला आहे. गोरगरीब मराठ्यांच्या लेकरांना मुख्यमंत्री फडणवीस वेठीस धरणार नाहीत, असा विश्वासही जरांगे पाटील यांनी व्यक्त केला. त्याचबरोबर तीन महिन्यानंतर सगळे सोयऱ्याचा अध्यादेश देखील मुख्यमंत्री फडणवीस लागू करतील असाही विश्वास मनोज जरांगे पाटील यांनी व्यक्त केला आहे.

    करिश्मा भुर्के

    लेखकाबद्दलकरिश्मा भुर्केमहाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून कार्यरत. सामना, झी २४ तास, न्यूज १८ लोकमतसह ४ वर्ष पत्रकारिता क्षेत्रातील अनुभव. सामाजिक, मनोरंजन विश्लेषणात्मक लेखनाची आवड.… आणखी वाचा

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed