• Fri. Mar 13th, 2026
    उत्तरप्रदेशातील जमिनीसाठी कल्याणमध्ये दोघं भाऊ भिडले, संतापाच्या भरात भावालाच निर्दयीपणे संपवले

    Kalyan News : उत्तर प्रदेशातील जोनपूर येथील जमिनीच्या वादातून कल्याण मध्ये धक्कादायक घटना घडली आहे. एका इसमाने आपल्या चुलत भावावर गोळीबार करून ठार केल्याची घटना घडली आहे.

    Lipi

    कल्याण : उत्तर प्रदेशातील जोनपूर येथील जमिनीच्या वादातून कल्याण मध्ये धक्कादायक घटना घडली आहे. कल्याण पूर्वेतील नाना पावशे चौकातील इमारतीत एका इसमाने आपल्या चुलत भावावर गोळीबार करून ठार केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी कोळसेवाडी पोलिसांनी तात्काळ तपास करून गोळीबार करणाऱ्या इसमाला अटक केली आहे.

    रणजीत दुबे असे गोळीबारात मृत झालेल्या इसमाचे नाव आहे. तर आरोपीचे नाव रामसागर दुबे आहे. मृत हा एका टोळीचा सदस्य होता. त्यावर मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात आली होती. गोळीबार करणारा रामसागर हा उत्तरप्रदेशातील पोलिसांच्या अभिलेखावरील गुन्हेगार आहे, अशी माहिती तपासात पुढे आली आहे.

    कल्याण पूर्वेत रणजीत दुबे आपल्या कुटुंबासह राहत होता. दुबे कुटुंबाची उत्तर प्रदेश येथे जमीन आहे. या जमिनीवरून रणजीत दुबेचा त्याचा चुलत भाऊ राम दुबे याच्याशी वाद सुरू होता. अनेकदा या दोघांमध्ये वाद झाले होते. राम दुबे देखील कल्याण पूर्वेत राहतो. काल मध्यरात्रीच्या सुमारास राम दुबे याने रणजीत दुबे याला नाना पावशे चौक परिसरात एकट्यात गाठले आणि यांच्यात वाद झाला. दरम्यान राम दुबे याने आपल्याकडून बंदुकीतून रणजीतवर गोळ्या झाडल्या. या गोळीबारात रणजीतचा जागीच मृत्यू झाला आहे. घटनेनंतर रामदुबे हा पसार झाला झाला होता. पोलिसांना घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तपास चालू आणि आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत.

    दोघेही काही दिवस उत्तरप्रदेशातील तुरुंगात होते

    पोलिसांच्या माहितीनुसार, मृत रणजीत दुबे हा कुटुंबीयांसह कल्याण पूर्वेतील नाना पावशे चौकात एका इमारतीत राहतो. अटक आरोपी रामसागर दुबे हे उत्तरप्रदेशातील जोनपूर येथील रहिवासी आहेत. जोनपूर येथे रामसागर, रणजीत यांची सामुहिक जमीन आहे. या जमिनीच्या विषयावरून त्यांच्यात मागील चार वर्षापासून वाद सुरू आहेत. मागील वर्षी या वादातून त्यांच्यात जोरदार भांडण झाले होते. त्यानंतर दोघेही काही दिवस उत्तरप्रदेशातील तुरुंगात होते. अलीकडेच दोघेही तुरुंगातून बाहेर आले होते.

    तुरुंगातून बाहेर आल्यावर त्यांच्यात पुन्हा जमिनीवरून वाद सुरू झाले होते. बुधवारी रात्री साडेअकरा वाजण्याच्या दरम्यान रंजीत आपल्या कल्याणमधील राहत्या इमारतीच्या बाहेर उभा असताना अचानक तेथे रामसागर दुबे आला. त्याने रणजीतच्या दिशेने गोळीबार करत त्याचा पाठलाग केला. जीव वाचविण्यासाठी रणजीत इमारतीच्या चौथ्या माळ्यापर्यंत धावत गेला. पण तेथे तो कोसळला. त्यानंतर रामसागरने धारदार चाकुने रणजीतवर वार करून त्याला ठार मारले.

    विमल पाटील

    लेखकाबद्दलविमल पाटीलविमल पाटील, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये कंसल्टंट म्हणून कार्यरत आहे. याआधी सामना, आरएनओ वृत्तसंस्थेमध्ये रिपोर्टर म्हणून काम केलं आहे. पत्रकारिता क्षेत्रात तीन वर्षांचा अनुभव आहे. राजकीय आणि विश्लेषणात्मक बातम्या लिहण्याची आवड.… आणखी वाचा

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed