• Tue. Sep 8th, 2026
फडणवीस-बावनकुळेंनी निर्णय बदलला, महायुतीच्या विरोधकांना प्रवेश दिला; प्रताप चिखलीकर नाराज

Authored byमानसी देवकर | Contributed byअर्जुन राठोड | महाराष्ट्र टाइम्स.कॉम 19 Feb 2025, 1:46 pm

‘मी सुरक्षेच्या गराड्यात जन्मलो नाही आणि सुरक्षेत राहणारा देखील नाही’, असं विधान राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी केलंय. सरकारने काही आमदारांची वाय दर्जाची सुरक्षा काढल्यानंतर नांदेडचे आमदार प्रताप पाटील यांनी ही प्रतिक्रिया दिलीय. हा निर्णय सरकारचा असून मी काही सुरक्षेच्या गराड्यात जन्मलो नाही आणि सुरक्षेत राहणारा देखील नाही. सरकारने गरज होती तेंव्हा सुरक्षा दिली आता काढून घेतली असे ते म्हणाले. तर महायुतीच्या विरोधात निवडणूक लढवणाऱ्यांना पुन्हा पक्षात घेतले हे पाहून वाईट वाटत असल्याचे सांगत प्रताप पाटील चिखलीकरांनी मुख्यमंत्री फडणवीस आणि भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे नाराजी व्यक्त केलीय.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed