• Fri. Mar 6th, 2026

    संतोष देशमुख चारित्र्यसंपन्न होते, सरकार बदनाम होऊ नये म्हणून पोलिसांनी प्लॅन केला; मराठा बांधव आक्रमक

    संतोष देशमुख चारित्र्यसंपन्न होते, सरकार बदनाम होऊ नये म्हणून पोलिसांनी प्लॅन केला; मराठा बांधव आक्रमक

    महाराष्ट्र टाइम्स.कॉम 18 Feb 2025, 9:47 pm

    मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर रोज नवनवीन खुलासे समोर येऊ लागले आहेत.देशमुखांचा मृतदेह केज रुग्णालयाकडे घेऊन जाण्याऐवजी पोलीस कळंब कडे घेऊन जात होते…अशी धक्कादायक माहिती मस्साजोग येथील ग्रामस्थांनी दिल्याने खळबळ उडाली आहे. त्यामुळे राज्यातील मराठा बांधव संतप्त झाल्याचे पाहायला मिळत आहे.संतोष देशमुख यांचा मृतदेह कळंबकडे घेऊन जाणाऱ्या पोलिसांना तात्काळ निलंबित करा.अशी मागणी सोलापूर मधील मराठा बांधवानी केली आहे.देशमुख यांच्या खून प्रकरणाला अनैतिक संबंध देण्याचा प्रयत्न सुद्धा होत आहेत.देशमुख हे मस्साजोग व बीड जिल्ह्यातील चारित्र्यसंपन्न सरपंच होते असंही ते म्हणाले. या सगळ्या प्रकरणाविषयी मराठा बांधवांशी संवाद साधलाय प्रतिनिधी इरफान शेख यांनी…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed