• Thu. Mar 12th, 2026
    मराठवाडा साहित्य संमेलन शनिवारपासून; दोन दिवस विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन

    Marathwada Sahitya Sammelan: वाळूज परिसरातील सांस्कृतिक चळवळीस बळ मिळणार असून, दोन दिवस चालणाऱ्या या संमेलनाचे उद्घाटन १५ फेब्रुवारीला मराठी भाषा आणि उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते होणार आहे.

    महाराष्ट्र टाइम्स

    वाळूज महानगर: मराठवाडा साहित्य परिषद व दगडोजीराव देशमुख महाविद्यालय वाळूज यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ४४ वे मराठवाडा साहित्य संमेलन येत्या १५ आणि १६ फेब्रुवारी २०२५ रोजी होणार आहे. या संमेलनामुळे वाळूज परिसरातील सांस्कृतिक चळवळीस बळ मिळणार असून, दोन दिवस चालणाऱ्या या संमेलनाचे उद्घाटन १५ फेब्रुवारीला मराठी भाषा आणि उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते होणार आहे.

    या वेळी छत्रपती संभाजी नगरचे पालकमंत्री तथा सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाठ, मंत्री अतुल सावे, आमदार अमित देशमुख आदींची प्रमुख उपस्थिती राहणार असल्याची माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली. मराठवाडा साहित्य संमेलनाचे नियोजित अध्यक्ष लेखक डॉ. भीमराव वाघचौरे आहेत. साहित्य रसिक आणि विजय शिक्षण प्रसारक मंडळाचे संस्थापक सचिव आणि संमेलनाध्यक्ष विजय राऊत स्वागताध्यक्ष असून मराठवाडा साहित्य परिषदेचे अध्यक्ष कौतिकराव ठाले सहआयोजक आहेत.
    बांगलादेशात १४०० नागरिकांची हत्या? संयुक्त राष्ट्रांच्या अहवालातील अंदाज
    दगडोजीराव देशमुख महाविद्यालय परिसरात होणाऱ्या या संमेलनासाठी विलासराव देशमुख साहित्यनगरी, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले विचारपीठ आणि राष्ट्रसंत तुकडोजी महाराज पीठ या स्वतंत्र व्यासपीठांवर विविध परिसंवाद होणार आहेत. संमेलनाच्या पहिल्या दिवशी ‘सामाजिक अस्वस्थतेमागील खदखद जातीची की मातीची’ यावर विशेष परिसंवाद होणार असून, डॉ. साहेब खंदारे, डॉ. मुस्तजीप खान, डॉ. राजेंद्र गोणारकर, डॉ. कुयंत कटारे आदींचा यात सहभाग असणार आहे. दोन दिवस चालणाऱ्या या संमेलनाचा समारोप विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, प्रसिद्ध लेखक अरविंद जगताप यांची प्रमुख उपस्थिती होणार आहे.
    ‘मोफत’ योजनांमुळे नागरिक परजीवी; राजकीय पक्षांच्या प्रथेवर सर्वोच्च न्यायालयाची टीका
    चित्रकार राजू बाविस्कर आणि डॉ. रवींद्र तोरवणे यांच्या मार्गदर्शनाखाली चित्र प्रदर्शन व चित्रकला कार्यशाळा होणार आहे. उद्घाटन प्रसिद्ध चित्रकार बैजू पाटील हे करणार आहेत. संमेलनाच्या विशेष बोधचिन्हाचे अनावरण पालकमंत्री संजय शिरसाट यांच्या हस्ते करण्यात आले. स्वागताध्यक्ष विजय राऊत, विवेक जयस्वाल, कौतिकराव ढाले, डॉ. गणेश मोहिते, डॉ. राहुल हजारे, डॉ. संजय सांभाळकर, मनीष जैस्वाल, रमेश कोनडलकर, डॉ. युवराज धबडगे, प्रा. नागेश बोंतेवाड, गणेश घुले आदींची उपस्थिती होती.

    किशोरी तेलकर

    लेखकाबद्दलकिशोरी तेलकर किशोरी तेलकर, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये कन्सल्टंट म्हणून कार्यरत असून पत्रकारितेमध्ये पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले आहे. ऑनलाइन माध्यमांमध्ये फ्रीलान्सिंगचा २ वर्षांचा अनुभव आहे आणि आता मटा ऑनलाइनमध्ये आहे. जनरल बातम्यासोबतच गुन्हेगारीविषयक बातम्यांमध्ये रस.… आणखी वाचा

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed