• Wed. Mar 11th, 2026

    एक चुकीचा निर्णय अन् आयुष्यभराच्या जमापुंजीवर पाणी; ८६ वर्षीय माजी सरकारी अधिकाऱ्याची मोठी फसवणूक

    एक चुकीचा निर्णय अन् आयुष्यभराच्या जमापुंजीवर पाणी; ८६ वर्षीय माजी सरकारी अधिकाऱ्याची मोठी फसवणूक

    Mumbai Crime: मलबार हिल येथे राहणाऱ्या माजी सरकारी अधिकाऱ्याला लॅण्डलाइन फोनवर एका व्यक्तीने संपर्क केला. त्याने एका कंपनीचे नाव सांगून ते गुंतवणुकीवर चांगला परतावा देत असल्याचे सांगितले.

    हायलाइट्स:

    • सायबरचोरांनी लुबाडले पाच वर्षांत तीन कोटी रुपये
    • आधी गुंतवणुकीचे प्रलोभन, नंतर कारवाईची धमक
    महाराष्ट्र टाइम्स
    old man1

    मुंबई : दक्षिण मुंबईतील एका सेवानिवृत्त सरकारी अधिकाऱ्याने अधिक पैसे कमवण्याच्या मोहापोटी आयुष्यभर कमावलेली रक्कम पाच वर्षांत गमावली. सायबरचोरांनी आधी गुंतवणुकीवर चांगला परतावा देण्याचे प्रलोभन दाखवून रक्कम स्वीकारली आणि नंतर कारवाईची धमकी दाखवून सुमारे तीन कोटी रुपये उकळले. धक्कादायक बाब म्हणजे हा सर्व प्रकार गेल्या पाच वर्षांपासून सुरू होता. फसवणूक लक्षात आल्यानंतर या वृद्धाने सायबर पोलिस ठाण्यात तक्रार केली आहे. मलबार हिल येथे राहणाऱ्या माजी सरकारी अधिकाऱ्याला लॅण्डलाइन फोनवर एका व्यक्तीने संपर्क केला. त्याने एका कंपनीचे नाव सांगून ते गुंतवणुकीवर चांगला परतावा देत असल्याचे सांगितले. बँकेत कमी व्याजदर असल्याने या अधिकाऱ्याने या गुंतवणुकीच्या योजनांमध्ये पैसे गुंतविण्याचे ठरविले. सुरुवातीला त्याने कमी रक्कम गुंतवली. या रकमेवर चांगला परतावा मिळाल्याने समोरील व्यक्तीने सांगेल त्याप्रमाणे वृद्धाची गुंतवणूक सुरू होती. रक्कम एक कोटी रुपयांच्या घरात पोहोचताच या अधिकाऱ्याच्या घरी कुरिअरने एक पत्र आले. प्राप्तिकर विभागाच्या नावाने असलेल्या या पत्रामध्ये उत्पन्नावर कर भरले नसल्याचे नमूद करण्यात आले होते.
    ‘मोफत’ योजनांमुळे नागरिक परजीवी; राजकीय पक्षांच्या प्रथेवर सर्वोच्च न्यायालयाची टीका
    काही दिवसांनी पोलिसांच्या नावाने पत्र आले. या मध्ये तुमच्या बँक खात्यावरून संशयास्पद व्यवहार झाल्याचे नमूद करण्यात आले होते. सुरुवातीला या अधिकाऱ्याने पत्रांकडे दुर्लक्ष केले, मात्र नंतर येणाऱ्या पत्रामध्ये अटकेची धमकी देण्यात आली. यावेळी वेगवेगळी कारणे सांगून अधिकाऱ्याकडून सुमारे तीन कोटी रुपये उकळण्यात आले.
    भारतात घुसखोरी करणाऱ्यांची आता खैर नाही! तुरुंगवासासह लाखोंचा दंड, मोदी सरकारचे कठोर नियम
    डिसेंबर २०१९ ते डिसेंबर २०२४पर्यंत हे सर्व सुरू होते. माजी अधिकाऱ्याने याबाबत भजनाच्या क्लासला येणाऱ्या एका विद्यार्थ्यांला विचारले. त्याने तुम्हाला पाच वर्षांत बोलण्यात अडकवून ठेवले असल्याचे या विद्यार्थ्याने सांगितले. त्यावेळी फसवणूक झाल्याचे लक्षात येताच वृद्धाने याबाबत सायबर पोलिस ठाण्यात तक्रार केली.
    किशोरी तेलकर

    लेखकाबद्दलकिशोरी तेलकर किशोरी तेलकर, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये कन्सल्टंट म्हणून कार्यरत असून पत्रकारितेमध्ये पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले आहे. ऑनलाइन माध्यमांमध्ये फ्रीलान्सिंगचा २ वर्षांचा अनुभव आहे आणि आता मटा ऑनलाइनमध्ये आहे. जनरल बातम्यासोबतच गुन्हेगारीविषयक बातम्यांमध्ये रस.… आणखी वाचा

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed