• Sat. Jun 6th, 2026
    निवडणुकीवेळी पाणीटंचाई दूर करण्याचं आश्वासन, मात्र परिस्थिती जैसे थे; महिलांना पाण्यासाठी सरपंचाला बांधलं

    Yavatmal Pusad News : पुसद तालुक्यातील गावात गंभीर पाणीटंचाई आहे. निवडणुकीवेळी सरपंचाने पाण्याची समस्या सोडवण्याचं सांगितलं, मात्र कोणतेही प्रश्न पदावर विराजमान झाल्यावर सोडवले नाही. त्यामुळे महिलांनी सरपंचाचे हात दोरीने बांधले.

    महाराष्ट्र टाइम्स.कॉम

    यवतमाळ : गावातील पाणीटंचाई दूर करण्याचे दूर करण्याचे आश्वासन न पाळणाऱ्या सरपंचाच्या शर्टवर ‘बेईमान सरपंच’ लिहून महिलांनी त्याचे हात दोरीने बांधले. नंतर सरपंचाला घेऊनच थेट उपविभागीय कार्यालयावर धडक दिली. ही खळबळजनक घटना पुसद तालुक्यातील माळपठार भागातील सावरगाव गोरे येथे घडली.

    राज्याला आजवर दोन मुख्यमंत्री देणाऱ्या आणि मागील ७२ वर्षांपासून नाईक घराण्याची सत्ता असलेल्या पुसद तालुक्यातील माळपठारावरील ४० गावांतील गावकरी भीषण पाणीटंचाईचा सामना करीत आहेत. काही गावांमध्ये जलजीवन मिशन अंतर्गत कामे हाती घेण्यात आली. पण, या कामांची गती संथ आहे. काही ठिकाणी निधी नसल्याने कंत्राटदाराने कामे बंद केली. अनेक ठिकाणी अनुभव नसलेल्या कंत्राटदारांना कामे देण्यात आली. त्यामुळे कामे पूर्ण होऊनही गावातील पाणीटंचाई कायम आहे. सावरगाव गोरे येथे भीषण पाणीटंचाई असल्याने महिलांना दूर अंतरावरून पाणी आणावे लागत आहे.
    घरात अठराविश्व दारिद्र्य, पत्र्याचं घर, पण सख्ख्या बहिणींची जिद्दीने यशाला गवसणी, MPSC एकत्र पास
    पाणीटंचाई दूर करण्यासाठी गावकऱ्यांनी सरपंचामार्फत अनेक निवेदने वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिले. पण, त्यांच्या निवेदनाची दखल घेण्यात आली नाही. ग्रामपंचायत निवडणुकीवेळी प्रताप विठ्ठल बोडखे यांनी सरपंच झाल्यावर गावातील पाणीटंचाई सहा महिन्यांत दूर करू असे आश्वासन दिले होते. पदावर विराजमान झाल्यानंतर त्यांनी हा प्रश्न सोडविण्यासाठी काहीही केले नाही. यावरून संतप्त सावरगावमधील काही महिला आणि पुरुषांनी सरपंच बोडखे यांना दोरीने बांधून पुसदच्या उपविभागीय कार्यालयासमोर मोर्चा काढला. नंतर तहसील कार्यालय आणि पंचायत समितीवरही घागर मोर्चा काढण्यात आला.
    नग्न उभं करत क्रूरपणे मारहाण, प्रायव्हेट पार्टवर कंपासचे घाव; कॉलेजमध्ये रॅगिंगचा भयंकर प्रकार, पाच जण अटकेत
    उन्हाळ्याच्या दिवसांत विदर्भातील अनेक गावांमध्ये पाणीटंचाईची समस्या निर्माण होते. दरवर्षीची ही समस्या असतानाही प्रशासनाकडून उपाययोजना केल्या जात नाहीत. यावरून अनेकदा आंदोलने केली जातात. वऱ्हाडातील खारपाणपट्ट्यात पाणीटंचाईची समस्या अधिक गंभीर आहे. नागपुरात २७ बाय ७ पाण्याची सोय उपलब्ध करण्यात आली आहे. पण, ग्रामीण भागात अजूनही पाण्यासाठी वणवण भटकावे लागत असल्याची स्थिती आहे. यवतमाळ जिल्ह्यातील माळपठारावरील या आंदोलनाने या प्रश्नाची चर्चा नव्याने होऊ लागली आहे.

    निवडणुकीवेळी पाणीटंचाई दूर करण्याचं आश्वासन, मात्र परिस्थिती जैसे थे; महिलांना पाण्यासाठी सरपंचाला बांधलं

    सावरगाव गोरे येथे २०२२ पासून या गावात जलजीवन मिशनची कामे सुरू आहेत. कामे अपूर्ण असल्याने नागरिकांना पिण्याच्या पाण्याची सोय नसल्याचा मुद्दा आंदोलकांनी मांडला. पुसद पंचायत समितीत गटविकास अधिकारी संजय राठोड यांनी नागरिकांचे म्हणणे ऐकून घेतले. दोन तास आंदोलकांशी चर्चा केली. जलजीवन मिशनच्या अधिकाऱ्यांशी फोनवर संपर्क साधून आंदोलकांच्या समस्या मांडल्या. अधिकाऱ्यांनी समाधानकारक उत्तर न दिल्याने सायंकाळी ५ वाजतापर्यंत आंदोलन चालले. स्वच्छ पिण्याचे पाणी ही नागरिकांची मुलभूत गरज असताना राज्यमंत्री इंद्रनील नाईक यांच्या मतदारसंघात नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी आंदोलन करावे लागत असल्यावरून संताप व्यक्त होत आहे.

    करिश्मा भुर्के

    लेखकाबद्दलकरिश्मा भुर्केमहाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून कार्यरत. सामना, झी २४ तास, न्यूज १८ लोकमतसह ४ वर्ष पत्रकारिता क्षेत्रातील अनुभव. सामाजिक, मनोरंजन विश्लेषणात्मक लेखनाची आवड.… आणखी वाचा

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed