Chhagan Bhujbal on Pankaja Munde : ‘स्वतंत्र पक्ष कोणीही काढू शकतं. पंकजाताईंच्या म्हणण्याप्रमाणे तो मोठाही पक्ष असू शकेल. पण, एका समाजावर पक्ष काढणं आणि यश मिळवणं हे कितपत यशदायी आहे? असा सवाल छगन भुजबळांनी उपस्थित केला आहे.
भुजबळ यांना आमदार सुरेश धस यांच्या वक्तव्याबाबत विचारले असता ते म्हणाले, की संतोष देशमुख किंवा सोमनाथ सूर्यवंशी यांच्या प्रकरणात एकच न्याय असावा. तो दलित समाजाचा आहे म्हणून वेगळा न्याय असे का? सर्वांना एकच न्याय असावा, यापुढेही अशीच मागणी कोणी करेल, मग ते चालेल का? जरा माणुसकी तरी असली पाहिजे, असे सांगत भुजबळ यांनी धस यांनाही सुनावले.
सन २००२ ची गोष्ट असेल, मी उपमुख्यमंत्री होतो. गोपीनाथ मुंडे माझ्याकडे आले आणि म्हणाले आपण एक वेगळा पक्ष काढू. तुम्ही, मी आणि गणपतराव देशमुख, आठवले एक पक्ष काढू. पक्ष चांगल्या रीतीने पुढे जाईल, असं ते म्हणाले. मी उपमुख्यमंत्री होतो, म्हटलं मला राजीनामा द्यावा लागेल. ते उपनेते होते त्यांनाही राजीनामा द्यावा लागेल. इतर लहान घटकांना घेऊन पक्ष निघत असेल, तर काहीच हरकत नाही असंही मी सांगितलं. पण, नंतर मुंडे यांनी तो विषय सोडून दिला, अशी आठवणही भुजबळ यांनी यावेळी सांगितली.

