Jitendra Awhad News : अभिनेते राहुल सोलापूरकर यांनी छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल वादग्रस्त विधान केले. जितेंद्र आव्हाड यांनी यावर तीव्र प्रतिक्रिया दिली आहे. सोलापूरकर यांच्याविरोधात पोलिस तक्रार दाखल झाली असून सोशल मीडियावरही त्यांच्यावर जोरदार टीका होत आहे.
जितेंद्र आव्हाड म्हणाले की, हे सरकार आल्यापासून सातत्याने शिवाजी महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर शाब्दिक प्रहार करण्याच्या प्रमाणात मोठी वाढ सुरू झालीये. कोण तो बिनलायकीचा राहुल सोलापूरकर शिवाजी महाराजांची पुस्तके मी वाचली आहेत म्हणत शिवाजी महाराजांच्या चातुर्यालाच आव्हान देतो आणि म्हणतो की, शिवाजी महाराजांनी पलायन करताना लाच दिली होती आणि त्यानंतर ते पळून गेले होते.
लहानपणी आई-वडिलांची हत्या डोळ्यांसमोर पाहिली, ३४ वर्षांनी घेतला बदला; IT इंजिनिअरने एकाच कुटुंबातील ५ जणांना संपवलंआता याला पुण्यातून कसे पळवायचे हे जनता ठरवेल. खूप पोलिस संरक्षण घेऊन फिरतोय. आज ना उद्या पोलिस सुरक्षा कमी होईल. नंतर त्याला समजेल की, यातून काय होतं. परवा तो बाबासाहेब आंबेडकरांबद्दल देखील तो असच काहीतरी बोलला. म्हणजे तुम्ही शिकलेले आहात, सर्व गुण तुमच्यात आहेत म्हणजे तुम्ही ब्राम्हण आहात, असे मी नाही म्हणत तो राहुल सोलापूरकर म्हणतोय. जो कोण तो सोलापूरकर आहे, त्याला कोल्हापूरकर करावे लागले.
म्हणजे त्याला कोल्हापूरच्या चप्पलेनेच मारावे लागेल. त्याच्याशिवाय असली माणसे सुधरत नाहीत. त्याला जर वाटत असेल की, तो मराठीमध्ये छान आणि सुंदर अशी दिलगिरी व्यक्त करतो तर आम्हाला या दिलगिरीची गरज नाही. त्याने महाराष्ट्राची माफी मागावी, देशाची माफी मागावी. हे सरकार आल्यावरच या सनातणी मनोवादांची माथी कशी फिरतात असाही प्रश्न जितेंद्र आव्हाड यांनी उपस्थित केला. यासोबत ते म्हणाले की, यांना इतकी ताकद कुठून येते. पार ते शिवाजी महाराज आणि आंबेडकरांबद्दलच बोलायला मोकळे होऊन जातात.

