Manoj Jarange Patil : मनोज जरांगे पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर टीका करत त्यांनी आपल्यासोबत षडयंत्र केल्याचा आरोप केला आहे. तसंच मराठा, धनगर समाजाचा घात केल्याचंही ते म्हणाले.
ऐकत नाही म्हणून माझं तोंड दाबण्यासाठी फडणवीसांचं षडयंत्र, जरांगेंचा मुख्यमंत्र्यांवर घणाघात
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मी तुम्हाला ऐकत नाही, दाबत नाही, म्हणून माझं तोंड बंद करायसाठी चाल अन् षडयंत्र रचत आहे. पाहुणे-रावळ्यांचा विषय काढतात, सगळा महाराष्ट्र माझा पाहुणे आहे. मी समाजाला वाऱ्यावर सोडत नाही. तुम्हाला वाटत असेल गुंतवल्यावर मी गप्प बसले? मी कुणाला घाबरत नाही. फडणवीस तुम्ही मराठा आणि धनगर समाजाचा मोठा घात केला, माझं तोंड बंद करायसाठी नोटीस देता? मात्र माझं तोंड बंद होणार नाही, असा इशाराच जरांगे पाटीला यांनी मुख्यमंत्र्यांना दिला आहे.
रस्त्यावरील खड्डे बुजवण्यासाठी शाळेतील मुलांना जुंपलं, जिल्हा परिषद शिक्षकांचा कारनामा; पालकांकडून संताप व्यक्त
ज्या पोलिसांनी लाठी हल्ला केला त्यांना बडता दिले आहेत आम्ही हे विसरलो नाही. गोळ्यांचा आवाज आला, तर आजही मुलं घाबरतात. मी आरक्षण मागू नये, गरीबाच्या मुलाचा फायदा होऊ नये, मोठे होऊ नये, नोकरीला लागू नये, म्हणून षडयंत्र रचत आहे. चाकणच्या पोरांवर गुन्हे दाखल केले, अकोल्यात देखील तसंच केलं साखळी उपोषण करणाऱ्यांवर गुन्हे दाखल केले. मुंबईत पोरांनी ८-८ महिने जेल बघितले, असं म्हणत फडणवीसांनी षडयंत्र रचल्याचं जरांगे पाटील म्हणाले.
Sanjay Raut : निवडणुका सैतानी पद्धतीने लढवल्या जात आहेत, दिल्ली निकालानंतर संजय राऊत भडकले
ऐकत नाही म्हणून माझं तोंड दाबण्यासाठी फडणवीसांचं षडयंत्र, जरांगेंचा मुख्यमंत्र्यांवर घणाघात
स्वतःची मुलगी जशी वाटते तसं तुम्हाला मराठ्यांच्या मुलींबाबत वाटत नाही. स्वतःच्या मुलीसाठी पाचशे मीटर दूर राहायला जाऊ शकत नाही. आमच्या अनेक लेकरं दोन – दोन, पाच – पाच किलोमीटर पायी शिकायला जातात. मागण्या मान्य करू असं म्हणत त्यादिवशी गोड बोलून उपोषण सोडवायला लावलं. आज १४ दिवस झाले आहेत, अशी आठवणही जरांगे पाटील यांनी करुन दिली.

