• Sun. Jun 14th, 2026

    एकनाथ शिंदे धीरगंभीर व्यक्तिमत्त्वाचे नेते आणि तुम्ही म्हणता नाराज… उपमुख्यमंत्र्यांच्या नाराजीवर देवेंद्र फडणवीसांचं अजब स्पष्टीकरण

    एकनाथ शिंदे धीरगंभीर व्यक्तिमत्त्वाचे नेते आणि तुम्ही म्हणता नाराज… उपमुख्यमंत्र्यांच्या नाराजीवर देवेंद्र फडणवीसांचं अजब स्पष्टीकरण

    CM Devendra Fadnavis on Eknath Shinde : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एकनाथ शिंदे नाराज असल्याच्या बातम्यांवर स्पष्टीकरण दिलं आहे. नाराजीच्या बातम्या पसरवल्या गेल्याचंही ते म्हणाले.

    Lipi

    अभिजित दराडे, पुणे : राज्यात महायुती सरकार स्थापन झाल्यापासून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे वारंवार नाराज असल्याच्या बातम्या समोर येतच असतात. सुरुवातीला मुख्यमंत्रीपद त्यानंतर मंत्रिमंडळाचा विस्तार आणि त्यानंतर पालकमंत्री पदावरून एकनाथ शिंदे हे नाराज असल्याच्या चर्चा होत होत्या. आता एकनाथ शिंदे यांच्या या नाराजीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अजब स्पष्टीकरण दिलं आहे.

    उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नाराजीच्या सतत प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या केवळ करमणूक करणाऱ्या आहेत. त्यात कोणतेही तथ्य नाहीत. एकनाथ शिंदे हे धीरगंभीर व्यक्तिमत्त्वाचे नेते आहेत. त्यांची तशीच छायाचित्र प्रसिद्ध करून त्यांच्या नाराजीच्या बातम्या पसरवल्या गेल्या, असे सांगतानाच देवेंद्र फडणवीस यांनी प्रसारमाध्यमांमध्ये सर्जनशीलता राहिलेली नाही. माहितीच्या मुळाशी जाण्याची, खात्री करून घेण्याची, शोध घेण्याची, नवनवीन विषयांना भेटण्याची वृत्ती आणि गांभीर्य माध्यमांमध्ये राहिले नाही, अशी टीकाही त्यांनी केली.
    Eknath Shinde : ‘सोन्याची अंडं देणारी कोंबडी समजून मुंबईला…’, एकनाथ शिंदे यांचा ठाकरेंवर खोचक निशाणा
    ‘जयपूर डायलॉग’च्या डेक्कन समिट कार्यक्रमात ज्येष्ठ पत्रकार आणि राजकीय विश्लेषक भाऊ तोरसेकर आणि जयपूर डायलॉगचे प्रमुख संजय दीक्षित यांनी फडणवीस यांची मुलाखत घेतली. या मुलाखतीत त्यांनी अनेक विषयांवर प्रकाश टाकला.

    दरम्यान, राहुल गांधी यांनी नुकत्याच घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये लोकसभा निवडणुकीपेक्षा महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीत ४० लाख मतदार वाढल्याचा दाखला देऊन हे भारतीय जनता पक्षाचे ‘व्होट इंजीनियरिंग’ असल्याचा आरोप केला होता. या आरोपाचा फडणवीस यांनी समाचार घेतला.
    मी देखील अर्थसंकल्प सादर करणार, लाडक्या बहिणी आणि…; Budget 2025 नंतर अजित पवारांची प्रतिक्रिया
    राहुल गांधी यांनी आपल्या पराभवाच्या कारणांचा शोध घेतला तरच त्यांचा पक्ष टिकून राहू शकेल. मात्र, ते केवळ बहाणेच शोधत राहिले तर आगामी काळात काँग्रेसची अवस्था आणखी बिकट झाल्याशिवाय राहणार नाही, असं फडणवीस यांनी सुनावलं. विधानसभा निवडणुकीत महायुती आणि महाविकास आघाडीला मिळालेल्या मतांमध्ये तब्बल एक कोटी मतांचा फरक असल्याची आठवणही त्यांनी करून दिली.

    पुढे बोलताना फडणवीस म्हणाले, राहुल गांधी हे सतत भ्रमात राहणारे नेते आहेत. जनतेने त्यांची साथ सोडली आहे याची जाणीवही त्यांना होत नाही. शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्या सारख्यांना बरोबर घेऊन त्यांनी पत्रकार परिषदा घेतल्या तर त्यांचे विचारही तसेच राहणार. मात्र या भ्रामक विचारांमुळे राजकतावाद्यांना बळ मिळत आहे. देशातील संवैधानिक यंत्रणाबाबत अपप्रचार करून त्यांच्याबद्दल अविश्वास निर्माण करण्याचा १८० अराजकतावादी संघटनांचा कट आहे. राहुल गांधी यांच्या भ्रामक विधानांमुळे त्यांना बळ मिळतं आहे, असं फडणवीस म्हणाले.

    एकनाथ शिंदे धीरगंभीर व्यक्तिमत्त्वाचे नेते आणि तुम्ही म्हणता नाराज… उपमुख्यमंत्र्यांच्या नाराजीवर देवेंद्र फडणवीसांचं अजब स्पष्टीकरण

    लोकसभा निवडणुकीत भाजपची लढाई या अराजकतावादी संघटनांशी होती. त्यांनीच भाजपबद्दल अनेक ‘फेक नरेटिव्ह’ मतदारांमध्ये पसरवली. त्याला तोडीस तोड उत्तर देण्यात आम्ही कमी पडलो. विधानसभा निवडणुकीत मात्र अशा अपप्रचाराला सडेतोड उत्तर देण्याची यंत्रणा संघ परिवारातच असल्याचं लक्षात घेऊन आम्ही संघ परिवारातील विविध संस्था संघटनांच्या सहकार्याने उत्तम कामगिरी करू शकलो, असंही फडणवीस यांनी स्पष्ट केलं.

    करिश्मा भुर्के

    लेखकाबद्दलकरिश्मा भुर्केमहाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून कार्यरत. सामना, झी २४ तास, न्यूज १८ लोकमतसह ४ वर्ष पत्रकारिता क्षेत्रातील अनुभव. सामाजिक, मनोरंजन विश्लेषणात्मक लेखनाची आवड.… आणखी वाचा

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed