• Fri. Mar 6th, 2026

    Beed Accident : जेजुरीच्या खंडेरायाचं दर्शन ठरलं अखेरचं, घरी जाताना काळाचा घाला, दोघांचा जागीच मृत्यू

    Beed Accident : जेजुरीच्या खंडेरायाचं दर्शन ठरलं अखेरचं, घरी जाताना काळाचा घाला, दोघांचा जागीच मृत्यू

    Beed Accidenrt News : बीड जिल्ह्यात मागील काही दिवसात अपघाताचे प्रमाण वाढले आहे. मांजरसुंभा-पाटोदा दरम्यान मुळुकवाडीजवळ झालेल्या भीषण अपघातात दोन जणांचा जागीच मृत्यू, तर दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. वाहन अति वेगाने चालवल्यामुळे अपघात झाला आहे. नागरिकांनी सावधगिरी बाळगावी आणि रात्री वाहन चालवण्याचे टाळावे असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

    महाराष्ट्र टाइम्स.कॉम

    दीपक जाधव, बीड : बीड जिल्ह्यात मागील काही दिवसात अपघाताच्या प्रमाणत वाढ झाल्याचे पाहायला मिळत आहे. रात्री १२ वाजण्याच्या सुमारास अहमदपूर ते अहमदनगर राष्ट्रीय महामार्गावरील मांजरसुंभा ते पाटोदा दरम्यान मुळुकवाडी येथे भीषण अपघात झाला. या अपघातात २ जागीच ठार आणि 0२ गंभीर जखमी झाले आहेत. प्रवाशी जेजुरी वरून देवदर्शन करून गावी सोनपेठ कडे जात असताना मुळुकवाडीजवळ वाहन चालकाचा गाडी वरील ताबा सुटल्याने समोर असलेल्या पुलाला गाडीने जोराची धडक दिली गाडी पुलावर आदळल्याने गाडीचा चकनाचुर झाला.

    वाहन क्रमांक MH 22 AM 4571 या गाडीतील दोन जनांचा जागीच मृत्यू झाला तर दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. यावेळी परिसरातील नागरिक मोठा आवाज आल्याने जागे झाले परिसरातील नागरिक त्या ठिकाणी जमले व नागरिकांनी जखमींना जिल्हा रुग्णालयात पुढील उपचारासाठी पाठवण्यात आले आहे. हा अपघात एवढा भीषण होता की यामुळे गाडीचे टायर देखील तुटून पडले आहे. तर गाडीचा चकणाचुर झाला आहे.

    बीड जिल्ह्यात गेले काही दिवसापासून अपघाताचे प्रमाण वाढताना पाहायला मिळत आहे. 19 जानेवारी रोजी सकाळी सहा वाजण्याच्या सुमारास एका बसने पोलीस भरतीचा प्रॅक्टिस करणाऱ्या तीन तरुणांना चिरडल्याची घटना ताजी असतानाच पुन्हा एकदा राष्ट्रीय महामार्गावर हा भीषण अपघात झाल्याची घटना घडली आहे. यामुळे वाहन चालकांनी रात्री वाहन चालवताना काळजी घ्यावी, त्याचबरोबर रात्री बे रात्री वाहन चालवूच नाही असं देखील प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे.

    अनेक वेळा वाहनावर नियंत्रण ठेवण्यासाठी वाहतूक प्रतिबंधन नियमन कायद्यानुसार अति वेगाने चालणाऱ्या वाहनावर दंड देखील टाकण्यात येतो. मात्र याची कुठलीही दखल वाहन चालक घेत नाहीत. त्यामुळे असे भीषण अपघात होताना पाहायला मिळतात. त्याचबरोबर दूरवरचा प्रवास करून वाहन चालक पैशाच्या हवेसापोटी दुसरे भाडे असते म्हणून वाहन सुसाट वेगाने चालवतात. यामुळे देखील अपघात होत असल्याचे पाहायला मिळत आहे त्यामुळे वाहन चालकांनी आपले वाहन नियंत्रित चालवावे यामुळे पुढील अपघात होण्याचे टळतील आणि कुणाचाही जीव जाणार नाही.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed