“मी कृषी घोटाळा काढला. त्यावर खोटं बोलले. आता कोर्टाची ऑर्डर आहे. त्याला त्यांचे वकील खोटं बोलत असतील तर मग आता या लोकांना काय बोलायचं? ते कळत नाही. खरंतर आताच्या घटकेला धनंजय मुंडे यांच्यावर सरळसरळ कोर्टाने ठपका ठेवला आहे”, असं अंजली दमानिया म्हणाल्या आहेत.
“करुणा मुंडे यांनी मला आधीदेखील संपर्क केला होता. त्यांचा विषय मी लढावा असं त्यांचं मत होतं. पण मी कोणाच्याही वैयक्तिक मुद्द्यांवर कधीच बोलत नाही. म्हणून मी बाकी काहीच बोलले नव्हते. मला आताच्या घटकेला स्त्री म्हणून बोलावसं वाटतंय. कारण त्यांना आज जी ऑर्डर मिळाली आहे, ती अतिशय गंभीर आहे”, असं अंजली दमानिया म्हणाल्या.
धनंजय मुंडे यांच्या वकिलांच्या प्रेसनोटवर अंजली दमानिया काय म्हणाल्या?
“मला आता असंही सांगण्यात आलं आहे की, धनंजय मुंडे यांच्या वकिलांनी प्रेस नोट जारी केली आहे. त्यामध्ये सरळसरळ म्हटलं आहे की, कौटुंबिक हिंसाचाराबद्दल कोर्टाने काहीच म्हटलेलं नाही. पण कोर्टाने डोमेस्टिक वायलन्स झालंय असं म्हटलं आहे. कोर्टाने निर्देशही दिले आहेत की, अशाप्रकारचं डोमेस्टिक वायलन्स व्हायला नको”, असं अंजली दमानिया यांनी सांगितलं.
‘मी रखेल नाही; वाल्मिक कराडने मला चुकीचा स्पर्श केला’, करुणा शर्मा यांचे रडता-रडता खळबळजनक आरोप
“मी कृषी घोटाळा काढला. त्यावर खोटं बोलले. आता कोर्टाची ऑर्डर आहे. त्याला त्यांचे वकील खोटं बोलत असतील तर मग आता या लोकांना काय बोलायचं? ते कळत नाही. खरंतर आताच्या घटकेला धनंजय मुंडे यांच्यावर सरळसरळ कोर्टाने ठपका ठेवला आहे. कौटुंबिक हिंसाचार झाला आहे, असं कोर्टाने नमूद केलं आहे. ती ऑर्डर आता माध्यमांना दाखवावी आणि त्याची कॉपी धनंजय मुंडे यांच्या वकिलांना पाठवावी, अशी मी विनंती करते”, असं अंजली दमानिया म्हणाल्या.
“कोर्टच्या ऑर्डरला खोटं म्हणणाऱ्या वकिलांच्या विरोधात बार काउन्सिलला तक्रार दिली पाहिजे की, अशा वकिलांची सनद रद्द करण्यात यावी. कारण कोर्टच्या ऑर्डरला ते खोटं म्हणत असतील तर अशा व्यक्तींची सनद सुद्धा रद्द झाली पाहिजे”, अशी मागणी अंजली दमानिया यांनी केली.

