“राजन साळवी यांना लोकसभेनंतरही आमच्या पक्षाकडून आमंत्रण होतं. ते येतो म्हणून सांगत होते. पण त्यांचा गैरसमज असा झाला की, महाविकास आघाडीची सत्ता येणार आणि मी आमदार होणार, मंत्री होणार. त्या अनुषंगाने ते तिथे राहिले आणि त्यांना पराभवाला सामोरं जावं लागलं”, असं किरण सामंत म्हणाले.
“राजन साळवी यांच्यासोबत दुसऱ्या पक्षात जायला कुणीही तयार नाहीत. ते सर्व आमच्या संपर्कात आहेत. त्यांचे पक्षप्रवेश आपण रोज पाहतोय. ते ज्या पक्षात जातील त्या पक्षामधील लोकं परत आमच्या पक्षामध्ये येतील. त्यामुळे त्यांचा पक्षप्रवेश थांबला आहे, असं मला वाटतं”, असं किरण सामंत यांनी सांगितलं.
Eknath Shinde : ‘सोन्याची अंड देणारी कोंबडी समजून मुंबईला…’, एकनाथ शिंदे यांचा ठाकरेंवर खोचक निशाणा
‘राजन साळवींना आमच्या पक्षाकडूनही आमंत्रण होतं’
“राजन साळवी यांना लोकसभेनंतरही आमच्या पक्षाकडून आमंत्रण होतं. ते येतो म्हणून सांगत होते. पण त्यांचा गैरसमज असा झाला की, महाविकास आघाडीची सत्ता येणार आणि मी आमदार होणार, मंत्री होणार. त्या अनुषंगाने ते तिथे राहिले आणि त्यांना पराभवाला सामोरं जावं लागलं. महायुतीची सत्ता मोठ्या फरकाने निवडून आली. त्यानंतर त्यांनी अनेक ठिकाणी मोठे प्रयत्न केले, असं माझ्या कानावर आलं आहे. त्यातील तथ्य मला माहिती नाही. पण उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे जो निर्णय घेतील तो आम्हा शिवसैनिकांना मान्य आहे”, असं किरण सामंत म्हणाले.

