Manij Jaranage Patil allegation on Dhananjay Munde : बीडमधील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याप्रकरणी मनोज जरांगे पाटील यांनी याप्रकरणी सुरुवातीपासूनच आक्रमक भूमिका घेतली आहे. मनोज जरांगे पाटील यांनी आज पुन्हा पत्रकार परिषद घेत धनंजय मुंडेंवर घणाघात केला आहे.
मनोज जरांगे पाटील म्हणाले, या टोळीतील लोकांचे आता पैसे नाही म्हणून खायचे वांदे झाले आहेत. हे कष्टवत जीवन जगत नाहीतच, यांचं जीवन केवळ गुंडगिरीवर चालतं आणि हे बंद देखील होणार नाही. या टोळीची जबाबदारी आता मुख्यमंत्र्यांची आहे, याचा टोळींचा नायनाट केला नाहीतर हे याला जबाबदार सरकारच असणार आहे. धनंजय मुंडेची टोळी म्हणजे जिल्ह्याला कलंक आहे.
Beed Crime : बीड पुन्हा हादरलं! तुझाही देशमुख करू म्हणत आंधळेच्या पोरांकडून होमगार्डवर कोयत्याने वार, डोक्याला 8 टाके, कारण काय?
तसेच जरांगे पाटील पुढे म्हणाले, बीडमधील मोहिते कुटुंबाच्याही आम्ही पाठीशी आहोत. अधीक्षकांनाही सांगतो की, यामागे कोण आहे, त्यांच्यावर कठोर कारवाई करा. जेलमधील आरोपीशी ते संपर्कात आहे का? याचा तपास करावा, अशी मागणीही मनोज जरांगे पाटील यांनी केली.
तर पुढे धनंजय मुंडेंना धारेवर धरले आह. म्हणाले, कराडला नुसत्या डोक्यात मुंग्या आल्या तर दवाखान्यात ठेवले, मग महादेव मुंडेला का नाही ठेवले. तो मृत्युशी झुंज देत होता. कराड फक्त पैसे कमवून देत होता म्हणून त्याची बडदास्त ठेवली जाते. वंजारी जातीला एवढी पत होती या जिल्ह्यात पण धनंजय मुंडेने सगळी पत घातली आहे. मान खाली घालून जगायची वेळ आलीय या टोळींमुळे, असा घणाघात जरागेंनी केला.
दरम्यान, आरोपी विष्णु चाटेने मोबाईल धनंजय मुंडेंकडे ठेवला आहे. या सर्व पळवाटा काढसल्या जात आहेत. पकडलं तरी कोणाला मग पोलिसांनी? मुख्यमंत्री म्हणतात सोडणार नाही कोणाला, पण पकडलंय तरी कोणाला? असा सवाल जरांगेंनी उपस्थित केला आहे. तर सामूहिक कट रचून संघटित गुन्हेगारी घडवून आणणारा धनंजय मुंडेच आहे, अशी दाट शंका आहे, असे म्हणत जरांगेंनी आपला मुद्दा अधोरेखित केला.
बीडमधील टोळ्यांची जबाबदारी आता मुख्यमंत्र्यांचीच…, जरांगे पाटलांचा घणाघात; धनंजय मुंडेंनाही घेरले
सरमाड्याची (कराड) एवढी प्रॉपर्टीच नाही आहे. तर ही प्रॉपर्टी मंत्री धनंजय मुंडेंचीच आहे, असा गंभीर आरोप जरांगेंनी केला असून या संपूर्ण प्रकरणात ईडी चौकशी देखील झाली पाहिजे, अशी मोठी मागणी देखील जरांगेंनी केली. तर टोळीला पैसे, गाडी बंगले दिले त्यांचीही चौकशी लागली पाहिजे, असेही जरांगे म्हणाले.
फडणवीसांना आनंदाची गादी मराठ्यांमुळेच मिळाली आहे. मराठ्यांशी बेईमानी केली तर आनंदावर विरजण पडू शकतं. आम्ही आता आंदोलनासाठी मुंबईला जाऊ तेव्हा वापस नाही येणार. शिवाजी पार्क आणि इतर मोठ्या मैदानांची पाहणी सुरू आहे, लवकरच फायनल करणार आहोत. आम्हाला परवानगी मिळाली नाही तरी जाणार आहोत, असे म्हणत जरांगेंनी आंदोलनाचा पुढचा प्लॅन सांगितला आहे.

