GBS Cases In Pune: ‘गुइलेन बॅरे सिंड्रोम’ची (जीबीएस) लागण होण्यामागे दूषित पाणी हेच प्रमुख कारण असल्याचे राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेने (एनआयव्ही) केलेल्या तपासणीतून स्पष्ट झाले आहे.
महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त पृथ्वीराज बी. पी. यांनी ही माहिती दिली. महापालिका, ‘एनआयव्ही’चे अधिकारी, राज्य सरकारच्या आरोग्य विभागाचे अधिकारी यांची बुधवारी दुपारी बैठक झाली. या बैठकीत ‘एनआयव्ही’च्या अधिकाऱ्यांनी तपासणीच्या अहवालाबाबत माहिती दिली. त्यातून ही बाब स्पष्ट झाली आहे.
शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेसला भाजपचा शह? पालकमंत्री नसलेल्या १७ जिल्ह्यांबाबत मोठा निर्णय
‘दूषित पाण्यामुळेच ‘जीबीएस’ची लागण होत असल्याचे ‘एनआयव्ही’ने तपासलेल्या नमुन्यातून स्पष्ट झाले आहे. मात्र, ‘जीबीएस’चे रुग्ण पूर्वीही आढळत होते. त्यामुळे आत्ताच त्याचे रुग्ण मोठ्या संख्येने का आढळत आहेत, याचा शोध घेतला जात आहे. त्यासाठी आणखी चाचण्या करणे आवश्यक आहे. त्यासाठी पाण्याचे नमुने १०० मिलिलीटर ऐवजी दोन लिटर इतके घेण्याचा व ते दीर्घकाळ साठवून ठेवण्याच्या सूचना ‘एनआयव्ही’ने केल्या आहेत. याशिवाय नागरिकांच्या घरापर्यंत पाणी देताना त्यात क्लोरिनचे प्रमाण किमान ०.३ पीपीएम असणे आवश्यक असल्याचेही ‘एनआयव्ही’ने म्हटले आहे, परंतु पालिकेच्या पाण्यात क्लोरिनचे प्रमाण ०.६,०.७ पीपीएम असल्याचे पृथ्वीराज यांनी स्पष्ट केले. याशिवाय बाधितांच्या शौच तपासणीसाठी दोन नमुने घेऊन काही काळ जतन करण्याच्या सूचनाही ‘एनआयव्ही’ने केल्या आहेत, असे पृथ्वीराज यांनी सांगितले.
‘शिवभोजन’ बंद होणार? पुढील आर्थिक वर्षात योजना बंद करण्याचा राज्य सरकारचा विचार
सहकार्य करण्याच्या सूचना
‘जीबीएस’ची लागण झालेले काही रुग्ण खासगी रुग्णालयात दाखल आहेत. ‘एनआयव्ही’तर्फे या रुग्णांची भेट घेऊन काही नमुने गोळा केले जात आहेत. मात्र, काही रुग्णालयांकडून सहकार्य केले जात नसल्याची तक्रार ‘एनआयव्ही’ने केली आहे. या पार्श्वभूमीवर सर्व खासगी रुग्णालयांनी ‘एनआयव्ही’ला सहकार्य करावे, अशी सूचना करण्यात आली आहे, असेही पृथ्वीराज बी. पी. यांनी सांगितले.

