Produced byविश्रांती शिंदे | Contributed byऋषिकेश होळीकर | महाराष्ट्र टाइम्स.कॉम2 Feb 2025, 3:50 pm
देशाच्या केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी शनिवारी संसदेमध्ये भारताचा अर्थसंकल्प सादर केला. यामध्ये शेती, उद्योग, व्यापार, शिक्षण यासह अन्य क्षेत्रासाठी वेगवेगळ्या तरतुदी करण्यात आल्या आहेत. पण विरोधकांनी या अर्थसंकल्पावर टीका करत महाराष्ट्राच्या पदरी निराशा अशी टीका केलीये. दरम्यान याविषयी काँग्रेस आमदार अमित देशमुख यांनी प्रतिक्रिया देत टीका केलीये. ते म्हणाले, महागाई कमी करण्यासाठीही कोणत्याही उपायोजना नसलेला अर्थसंकल्प सादर केलाय. त्यामुळे सामान्य नागरिक, शेतकरी आणि रोजगाराच्या प्रतीक्षेत असलेले युवक या सर्वांचीच..केंद्र सरकारने घोर निराशा केली आहे अशी टीका यावेळी काँग्रेस आमदार अमित देशमुखांनी केली.